शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 15:23 IST

वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्व शक्तीनिशी तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुंबई वारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी सर्व शक्तीनिशी तयारीला लागलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुंबई वारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात यावा, या मागणीसाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहे. पक्षातीलच काही इच्छूक उमेदवार निवडणुक लढण्याकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पक्षात सक्रीय राहून आतापर्यंत केलेल्या कामाच्या फाईल्स घेवून अनेकांनी आपल्याला संधी देण्याची मागणी लावून धरली आहे.वाशिम विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे असला तरी मित्र पक्ष शिवसेनेच्यावतिनेही इच्छुकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. अद्यापपर्यंत युतीच्या जागा वाटपाचा निर्णय न झाल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांनी मातोश्रीवरचा संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीकडूनही इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. भाजपाच्यावतिने विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकवेळ उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. कारंजा वि धानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटयावर आला होता. गत निवडणुकीत युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यामध्ये भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यामुळे भाजपाच्यावतिने या मतदारसंघावर दावा करण्यात येत असला तरी शिवसेनेतर्फे मात्र हा मतदार संघ आमच्या वाटयावर असल्याने शिवसेनेचा उमेदवार देण्याची मागणी रेटली जात आहे.दूसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमधील उमेदवारांच्या हालचाली मात्र पाहिजे त्या प्रमाणात गतिमान झाल्याचे दिसून येत नाहीत.रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार फायनल असल्याचे बोलल्या जाते. काँग्रेसच्या बालेकिल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपा, शिवसेना, शिवसंग्रामच्यावतिने आपापल्यापरिने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या मतदारसंघामध्ये उमेदवारीवर शिवसेना व शिवसंग्रामही दावा करित आहे. वंचित आघाडीच्या हालचाली देखील या मतदारसंघामध्ये चांगल्याच गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी बहुतांश राजकीय पक्षाचे नेते मुंबई येथे तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे. हा विषय तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेचा ठरला आहे.

टॅग्स :Politicsराजकारणwashimवाशिम