शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नशिबी असे कसे हे मरण; स्मशानभूमीअभावी पाऊसपाण्याने अर्ध्यावरती विझले सरण

By सुनील काकडे | Updated: July 13, 2022 17:42 IST

शेंदूरजना आढाव या गावाचा विकास सर्वच पातळ्यांवर खुंटला असून स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना उघड्यावरच अंत्यविधी पार पाडावा लागतो.

वाशिम: जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेंदुरजना आढाव (ता.मानोरा) येथील ज्येष्ठ नागरिक वाघू जाधव यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी सोमवार, ११ जुलै रोजी निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकरी, नातेवाईक जमले आणि अंत्ययात्रा काढण्यात आली. गावकऱ्यांसाठी सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने मृतदेहाला उघड्यावर चिताग्नी देण्यात आला; मात्र अशात पाऊस सुरू झाल्याने सरण अर्ध्यावरती विझले. या घटनेने उपस्थितांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

शेंदूरजना आढाव या गावाचा विकास सर्वच पातळ्यांवर खुंटला असून स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना उघड्यावरच अंत्यविधी पार पाडावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या उग्ररुप धारण करते. अग्नी दिलेले सरण पावसाचे पाणी पडून अर्ध्यावरती विझण्याचा प्रकार या दिवसांत नेहमीच घडतो. शासन-प्रशासन मात्र यासंदर्भात गंभीर नसून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांशी कुणालाच काही देणे-घेणे नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमधून याप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूwashimवाशिम