शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

वाशिम   जिल्ह्यात सोयाबीनची आवक वाढली, भाव पडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:00 IST

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनाफेडद्वारे खरेदी सुरू करण्याची गरज

वाशिम: गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढ आहे; परंतु शेतकºयांना अद्यापही हमीभावापेक्षा खूप कमी दराने सोयाबीन विकावे लागत असून, जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरूवात करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली असून, परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी सोयाबीनचे नुकसानही झाले आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यामधील नव्वद टक्के सोयाबीनची सोंगणी आणि काढणीही उरकली असून, शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी घाई करीत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी एकट्या कारंजा बाजार समितीमध्ये १० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर त्या खालोखाल वाशिम बाजार समितीमध्ये ६ हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकºयांनी आणले होते; परंतु जिल्ह्यातील सर्व बाजारातील दराची आकडेवारी तपासली असता या शेतमालास सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत, तर शासनाने यंदा या शेतमालास बोनससह ३०५० रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. याचा विचार केल्यास सध्या शेतकºयांकडून ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण जिल्हाभरात नाफेडमार्फ त सोयाबीनच्या खरेदीला सुरूवात करण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत केवळ मंगरुळपीर येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांसाठी नाफेडद्वारे खरेदीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी