शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ऑनलाईन शिक्षणामुळे गरीब विद्यार्थ्यांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 17:18 IST

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्युज नेटवर्ककारंजा (वाशिम): कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर यंदाचे शैक्षणिक सत्र अद्यापही पूर्णपणे सुरू झाले नाही. त्यात खासगी शाळांनी ऑनलाईन पद्धतीचा आधार घेतला; परंतु गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन घेण्याएवढी रक्कम नसतानाच शाळांकडून अतिरिक्त शुल्कही वसूल करण्याचा प्रकार होत असल्याने गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात पाहायला मिळत आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे शासकीय शाळा बंदच आहेत. काही खासगी शाळा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करीत आहेत; परंतु ऑनलाईन पद्धतीच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क वसुली करण्याचा प्रकार कारंजात पाहायला मिळत आहे. त्यातच गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन घेऊन देण्याची ऐपत पालकांची नसल्याने गरीब विद्यार्थी शिक्षणात मागे पडत आहेत. काही शाळांना शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतानही कारंजा शहरातील नामांकीत शाळा अद्यापही डोनेशनचा अट्टाहास करीत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना अध्ययन आणि शाळेसाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा अधिक वेळ ऑनलाईनच्या अभ्यासात गुतूंन राहावे लागत असून, काही शाळांकडून सकाळी ७.२५ पासून मधल्या काळातील अर्धातास वगळता ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनवर अध्ययनासाठी गुंतवून ठेवले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणाºयाची शक्यता निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याची चौकशी करण्याची मागणी पालक करीत आहेत.

कारंजातील शाळा विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेत असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे अद्याप आली नाही. पालकांनी न घाबरता आमच्याकडे तक्रार करावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -सुरेश अघडते,गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती कारंजा लाड

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र