शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सरपंचाची मनमानी; ग्रामस्थांचा ‘एल्गार’, पंचाळा येथे शेकडो ग्रामस्थांचे ‘जवाब दो’ आंदोलन

By सुनील काकडे | Updated: September 4, 2023 14:55 IST

सुनील काकडे, वाशिम : तालुक्यातील गट ग्रामपंचायत पंचाळाच्या सरपंचांने मनमानी करणे सुरू केले. यामुळे विकासकामे थांबली असून ऐनवेळी स्थळ ...

सुनील काकडे, वाशिम: तालुक्यातील गट ग्रामपंचायत पंचाळाच्या सरपंचांने मनमानी करणे सुरू केले. यामुळे विकासकामे थांबली असून ऐनवेळी स्थळ बदलून घेतलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या कुठल्याही समस्येवर चर्चा न झाल्याचा मुद्दा समोर करून चार गावांमधील शेकडो ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारत ४ सप्टेंबर रोजी ग्रा.पं. कार्यालयासमोर ‘जवाब दो’ आंदोलन केले.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, पंचाळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा २९ ऑगस्ट रोजी घेतली. ही सभा मोहगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळेत होईल, असे कळविण्यात आले; मात्र नियोजित ठिकाणी ग्रामसभा न घेता ती ऐनवेळी इतरत्र घेण्यात आली. त्यामुळे अनेकांना सभेला हजर राहता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

या ग्रामपंचायतीकडे सव्वा कोटी रुपयांचा निधी पडून असताना कुठलीच कामे केली जात नाहीत. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ४ सप्टेंबर रोजी ‘जवाब दो’ आंदोलन केले. चारही गावांमधील जिल्हा परिषद शाळांची कामे, नाल्यांची स्वच्छता, स्मशानभूमीची कामे, गरजूंना घरकुल बांधून देणे, पाणीपुरवठा योजना आदींसह इतरही अनेक विषयांवर आवाज उठविण्यात आला. आंदोलनात पंचाळा, सुरकंडी, मोहगव्हाण येथील शेकडो ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिम