शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

'बहुजन हिताय' कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:43 IST

पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  कारंजा येथील बहुजन हिताय कर्मचारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून कांरजा येथील सहाय्यक दुय्यक निबंधक यांची नेमण्ूाक झाल्याने सदर पतसंस्थेतील ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.  कांरजा येथील बायपास परिसरातील गुरूकृपा हॉटेलच्या ईमारतीत बहुजन हिताय कर्मचारी मर्यादित पतसंस्था रजि नं. ७६४ ही मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. सदर पतसंस्थेचे रामेश्वर सावके  यांच्या अध्यक्षतेखाली ११ संचालकांचे संचालक मंडळ होते. त्यातील ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने सदर पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधकाच्या वतीने देण्यात आली आहे. राजीनामा देणाºया संचालकात अनंता जनार्धन धोटे ,प्रविण सखाराम पुरी , विष्णू भगवान वाघ, सुधाकर श्रीकृष्ण राउुत, शेषराव मुळे व मोहन आत्माराम घाटे या संचालकांचा समावेश आहे. वैयक्तिक अडचणीमुळे राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सादर केलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. सदर पतसंस्थेत ७ ते ८  ठेवीदारांच्या ३२ लाख रूपयांच्या ठेवी असून प्रशासकाची नेमणूक केल्याने ठेवीदारांची धाकधुक वाढली आहे. संचालक मंडळाच्यावतीने मजीर्तील ३५ कर्जदारांना ६५ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सध्यपरिस्थितीत सदर पतसंस्था डबघाईस आली असून पतसंस्थेत  रक्कम जमा नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे आव्हान प्रशासकापुढे उभे ठाकले आहे. आमच्या प्रतिनीधींनी कांरजाचे सहायक दुय्यम निबंधकाशी संपर्क साधला असता सदर पतसंस्थेच्या ६ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासक म्हणून १४ फेबु्रवारी २०१९ रोजी गुल्हाणे यांची नेमणूक करण्यात आली. कर्जदारांच्या कर्जवसुलीतून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जाईल असे यावेळी बोलतांना ए. आर. गुल्हाणे यांनी सांगितले. येत्या २ ते ३ दिवसात  कर्जदाराकडून २० लाख रूपयांची वसुली करून टप्प्याटप्याने ठेवीदारांना देण्यात येईल. यासाठी १४ एप्रिल रोजी सदर पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत कर्जदारांची बैठकही घेण्यात आली. त्यामुळे सदर पतसंस्थेतील ठेवीदारांनी चिंता करू नये असे आवाहन सहायक दुय्यम निबंधक गुल्हाणे यांनी केले पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक जरी असली तरी ठेवीदारांनी काळजी करु नये. पतसंस्थेत ३२ लाखाच्या ठेवी असून त्यावर ६५ लाख कर्जवाटप आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत दिल्या जातील, ठेवीबद्दल काळजी करु नयेत्र-पी.एम. गुल्हाने , सहाय्यक दुय्यम निबंधक

टॅग्स :washimवाशिम