शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 14:41 IST

वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत.

वाशिम : गत आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे  शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजन बहुतांशी कोलमडले असून शासनस्तरावरून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे आता त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सद्या सुरू असून अर्धीअधिक महसूल यंत्रणा शेतशिवारांमध्ये दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाल्यासह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच विविध संकटांनी खचलेला जिल्ह्यातील शेतकरी अधिकच हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे आगामी खरिप हंगामात कराव्या लागणाºया खर्चाचे नियोजन पुरते कोलमडल्याचा सूर नुकसानग्रस्त शेतकºयांमधून उमटत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाचा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित गावांचे पंचनामे सद्या केले जात आहेत. महसूल विभागाची अर्धिअधिक यंत्रणा याकामी गुंतली असून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीट