शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पशुवृक्ष प्रतिष्ठान भागवतेय पक्ष्यांची तृष्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:42 IST

दरवर्षीच्या उन्हाळ्यात रिसोड शहरात ४० डिग्रीपेक्षा अधिक उन्ह तापते. अशा स्थितीत मुक्या पक्ष्यांचा पाण्यावाचून जीव कासावीस होतो. ही बाब ...

दरवर्षीच्या उन्हाळ्यात रिसोड शहरात ४० डिग्रीपेक्षा अधिक उन्ह तापते. अशा स्थितीत मुक्या पक्ष्यांचा पाण्यावाचून जीव कासावीस होतो. ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी शहरातील काही युवकांनी एकत्र येत पशुवृक्ष प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून आकाशअण्णा जिरवणकर, दीपक जिरवणकर, विशाल भालेराव, सोहम आसनकर, अशोक थोरात, हर्षल तायडे, सिध्देश्वर अन्नसत्रे, प्रथमेश धोतकर, सोहम पोधडे, पार्थ थोरात, वेदांत टेंभरे, साहील तायडे, गणेश तायडे, विशाल काळे, चैतन्य टेंभरे, संस्कार पोधाडे, अथर्व भोजे ही युवा मंडळी पक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी परिश्रम घेत आहे. याही वर्षी शहरात विविध ठिकाणी पक्ष्यांकरिता जलपात्र बसविण्यात आले असून, पक्ष्यांचे पोट भरण्यासाठी तांदुळाचीही व्यवस्था या युवकांनी स्वखर्चातून केली आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे शहर परिसरात सर्वत्र काैतुक होत आहे.

...........................

कोट :

कडक उन्हाळ्यात पक्ष्यांचा जीव पाण्यावाचून कासावीस होतो. त्यामुळे पशुवृक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्ष्यांकरिता पाणी व तांदुळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील आपापल्या घरांवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र बसवावे. या मुक्या जिवांचे उदरभरण करण्यासाठी तांदूळ किंवा अन्नधान्य ठेवायला हवे.

- आकाशअण्णा जिरवणकर

सदस्य, पशुवृक्ष प्रतिष्ठान, रिसोड