शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संतप्त शेतक-यांनी मांडला तहसील कार्यालयात ठिय्या!

By admin | Updated: March 7, 2017 02:43 IST

नियमानुसार तूर खरेदी, हमीभाव मिळण्याची मागणी

मालेगाव, दि. ६- नाफेडने नियमानुसार तूर खरेदी करावी, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी सोमवार, ६ मार्च रोजी दुपारी १.३0 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात येथे ठिय्या आंदोलन केले.बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दर कमी होण्यास सुरूवात झाली. शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा, यासाठी केंद्रशासनाच्या आधारभूत किमतीनुसार नाफेडकडून प्रमुख केंद्रांवर तुरीची खरेदी केली जात आहे. हमीभाव व बोनस मिळून तुरीला प्रतिक्विंटल ५0५0 रुपये दर मिळत आहे; परंतु मालेगावात शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांचीच अधिक चलती आहे. व्यापार्‍यांनी यंत्रणांशी हातमिळवणी करून त्यांचा माल सरळ व रात्रीच्या वेळी जात असून, शेतकर्‍यांच्या मालाची दोन ते तीन वेळा चाळणी करून १५ ते २0 दिवसांनंतरही नंबर लागत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मालेगाव तहसील कार्यालयात जाऊन चक्क तहसीलदारांच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले.प्रभारी तहसीलदार राठोड यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी बाबूराव आढाव, गजानन आढाव, माणिक गालट, कृष्णा घुगे, विलास बोरचाटे, दत्ता शिंदे, प्रल्हाद शिंदे, पिंटू जाधव, अजय इंगोले, गजानन वाझूळकर, गणेश लादे, ओम केनवडकर, कैलास गिर्‍हे, प्रदीप मोरे, श्यामराव जोगदंड, कैलास लहाने, पांडुरंग लहाने उपस्थित होते.