शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीएवढीच ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:15 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पूर्वीप्रमाणे ६५ वर्षे ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना शासन निर्णयात बदल करण्याची मागणी करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील तीन आमदारांना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. 

ठळक मुद्देराज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांहूून कमी करून ६०  वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे हजारो अंगणवाडी कर्मचाºयांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी येईल, तसेच इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भारही वाढणार आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे ठेवावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचाºयांनी केली आहे.

वाशिम : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांहूून कमी करून ६०  वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे  यामुळे राज्यातील १३००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून सेवामूक्त करण्यात येणार असून,  त्यांच्यावर ऊपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे पूर्वीप्रमाणे ६५ वर्षे ठेवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना शासन निर्णयात बदल करण्याची मागणी करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील तीन आमदारांना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे. 

राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०१८ ला निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचार्यांची सेवनिवृत्तीची वयोमयार्दा ६० वर्षे करण्याचे ठरविले आहे, तसेच कमी उपस्थितीच्य अंगणवाड्यांचेचे समायोजन करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल रोजी १३ हजार अंगणवाडी सेविकांना सेवामूक्त करण्यात येणार असून, कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन केल्यानंतर ३२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रत्यक्षात इतर राज्यांपेक्षा आधीच महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर महिला आणि बाल विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवून इमाने इतबारे काम करीत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांना ५००० रुपये, तर मदतनीसांना २५०० रुपये प्रति महिना मानधन मिळत आहे. राज्यातील बहुतांश अंगणवाडी कर्मचाºयांचा संसार अंगणवाडीच्या मानधनावरच आहे. अशात शासनाने त्यांची सेवा वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा आणि कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो अंगणवाडी कर्मचाºयांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी येईल, तसेच इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भारही वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे ठेवावी आणि कमी उपस्थितीच्या अंगणवाड्यांचे समायोजन न करता इतर पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाºयांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक आणि आमदार लखन मलिक यांना निवेदन सादर केले असून, ही समस्या मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याची मागणीही केली आहे. 

 

लखन मलिक यांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

अंगणवाडी सेविकांनी त्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कमी न करता पूर्वीप्रमाणेच ६५ वर्षे ठेवण्याच्या मागणीसह इतर मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यासाठी वाशिम-मंगरुळपीरचे आमदार लखन मलिक यांना निवेदन सादर केल्यानंतर लखन मलिक यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या पत्रासोबत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाची प्रतही त्यांनी जोडली आहे. 

टॅग्स :washimवाशिमLakhan Malikलखन मलिक