शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी ; आधार केंद्रांची कमतरता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:46 IST

वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

ठळक मुद्देबोगस लाभार्थीला चाप बसविण्याच्या दृष्टिकोनातून १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून आधार नोंदणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पुरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसविण्याच्या दृष्टिकोनातून १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थींची आधार नोंदणी झालेली आहे व ज्यांचे आधार कार्ड या योजनेशी जोडण्यात आले आहे, अशाच लाभार्थींना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही, अशा बालकांची आधार केंद्रात नोंदणी करून आधार क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून आधार नोंदणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केवळ २० च्या आसपास आधार नोंदणी केंद्र असल्याने गैरसोय होत आहे. आधार नोंदणी केंद्राची संख्या वाढवून देण्याची मागणी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके यांनी गुरूवारी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड