शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अंगणवाडीतील बालकांची आधार नोंदणी ; आधार केंद्रांची कमतरता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:46 IST

वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

ठळक मुद्देबोगस लाभार्थीला चाप बसविण्याच्या दृष्टिकोनातून १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून आधार नोंदणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वाशिम - एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये ्म्हणून बालकांची आधार नोंदणी केली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. 

सन १९७५ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पुरक पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसविण्याच्या दृष्टिकोनातून १ एप्रिल २०१८ पासून लाभार्थींची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थींची आधार नोंदणी झालेली आहे व ज्यांचे आधार कार्ड या योजनेशी जोडण्यात आले आहे, अशाच लाभार्थींना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही, अशा बालकांची आधार केंद्रात नोंदणी करून आधार क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून आधार नोंदणी प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केवळ २० च्या आसपास आधार नोंदणी केंद्र असल्याने गैरसोय होत आहे. आधार नोंदणी केंद्राची संख्या वाढवून देण्याची मागणी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके यांनी गुरूवारी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड