शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

नुकसानभरपाईची रक्कम कर्जखात्यात वळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 15:16 IST

वाशिम - पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्राप्त होणारी नुकसानभरपाईची रक्कम सद्यस्थितीत कर्जखात्यात वळती केली जात असल्याने शेतकºयांच्या अडचणींत वाढ होत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकºयांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान हे संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त निर्देश आहेत. जिल्ह्यातील काही बँकेमध्ये सदर रक्कम कर्जखात्यात वळती केली जात आहे.

 

वाशिम - पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्राप्त होणारी नुकसानभरपाईची रक्कम सद्यस्थितीत कर्जखात्यात वळती केली जात असल्याने शेतकºयांच्या अडचणींत वाढ होत आहे. शेतकºयांच्या तक्रारी लक्षात घेता संबंधित बँकांनी कर्ज खात्यात रक्कम  जमा न करता संबंधित शेतकºयांच्या बचत खात्यात जमा करावी, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. 

गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४  शेतकºयांपैकी १ लाख १४ हजार ६३३ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. यापैकी ७८ हजार १०७ शेतकºयांना ७६ कोटी १९ लाख २७ हजार ५४२ रुपये नुुकसानभरपाई मंजुर झाली आहे. पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान हे संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येऊ नये, असे शासनाचे सक्त निर्देश आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही बँकेमध्ये सदर रक्कम कर्जखात्यात वळती केली जात आहे. यासंदर्भात काही शेतकºयांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीदेखील केलेल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने पीक कर्ज किंवा नुकसानभरपाईची रक्कम शेतकºयांच्या कर्जखात्याऐवजी बचत खात्यात जमा करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे बँक प्रशासनाला पत्र जारी करून कर्जखात्यात रक्कम वळती न करण्याचे बजावले आहे. या पत्रात नमूद केले की, कर्जखात्यात रक्कम वर्ग करण्यात येत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी असून, ही गंभीर बाब आहे. अशा कार्यप्रणालीमुळे आपण शासन निर्देशाच्या अंमलबजावणीमध्ये हेतुपुरस्पर दुर्लक्ष  करीत असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरीवर्गात शासनाची प्रतिमा मलीन होत असून, ही बाब निश्चितच प्रशासकीय कार्यप्रणालीला शोभणारी नाही. शासनाकडून तसेच विमा कंपनीकडून शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली ही रक्कम संंबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याबाबतची कार्यवाही केली तर यापुढे संबंधित बँक अधिकाºयांना व्यक्तिश: जबाबदार ठरवून त्यांच्याविरूद्ध फौजदारी कार्यवाही प्रस्तावित  केली जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत.

टॅग्स :washimवाशिमbankबँकFarmerशेतकरी