कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच रूख्मिना बाळू लांभाडे होत्या. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला अतुल गायकवाड पं. स. सदस्य, उपसरपंच भारत भगत, मुख्याध्यापक जीवन हगवणे, धनगर समाज युवा मल्हार सेना राज्य मुख्य सचिव ज्ञानेश्वर मुखमाले, ग्रा. पं. सदस्य शिल्पा शेंद्रे, मुरलीधर माचलकर, परशराम लांभाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांभाडे, श्रीकृष्ण ठाकरे, सुबोध वंजारे, वैभव डाळ, सुभाष मुखमाले, संतोष भगत, शारदा कोल्हे, कोंडाबाई तट्टू, दुर्गा गावंडे, बाळूभाऊ लांभाडे, आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानेश्वर मुखमाले यांनी फक्त निवडणुका तोंडावर आल्यावरच लोकप्रतिनिधींना धनगर समाज दिसतो का, निवडणुका झाल्यानंतर धनगर समाजाच्या मतांवर निवडूनही त्या समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे असच किती दिवस सहन करायचे, असा प्रश्न उपस्थित केला.
पार्डी ताड येथे अहिल्यादेवी होळकर पुण्यतीथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST