शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

घाम गाळून पिकविलेला माल अडकला शेतातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 14:50 IST

जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून शेतकरी कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करित आहेत; मात्र जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.शेतकरी, शेतमजूरांचा विविध कामांबाबत महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या समस्या, प्रश्न निकाली निघावेत, यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शी व्हावे, या उद्देशाने महाराजस्व अभियानाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. असे असले तरी जिल्ह्यात या अभियानास पूर्णत: खीळ बसली असून शासकीय जमिनीवरील अतीक्रमण काढणे व गाव नकाशानुसार शेतशिवारांमधील अतीक्रमीत रस्ते, पाणंद रस्ते, शिवार रस्ते, शेतांवर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.एकीकडे शेतकऱ्यांचा माल मुंबई, पुणे येथे पाच ते सहा तासात पोहोचविण्यासाठी शासनाकडून रस्त्याचे जाळे निर्माण केले जात असल्याचे भासविण्यात येत आहे; तर दुसरीकडे मात्र शेकडो शेतकºयांच्या शेतांना जोडल्या जाणाºया पाणंद रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली असून खरीप हंगामात पिकलेला शेतमाल घरी आणता येणे यामुळे अशक्य झाल्याने शेतकरी वैतागले आहेत.शिरपूर परिसरात सर्वाधिक समस्या; शेतकरी त्रस्तपाणंद रस्ते नादुरूस्त असण्याची सर्वाधिक समस्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील गावांना जाणवत आहे. शिरपूर-केळी-भेरा, शिरपूर-माणका, शिरपूर-वडप हे पाणंद रस्ते प्रचंड खराब झाले असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.शिरपूर येथून केळी, भेरा शेतशिवाराकडे जाणाºया पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलामुळे शेतात ये-जा करणे कठीण झाले असून सोयाबीन अद्यापपर्यंत शेतातच पडून आहे. रब्बी हंगामाची पेरणी देखील यामुळे रखडली आहे. प्रशासनाने रस्त्याची दुरूस्ती करावी.- संजय गोपाळराव देशमुखत्रस्त शेतकरी, शिरपूर

जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत विविध स्वरूपातील कामे सातत्याने सुरू असतात. त्यातूनच पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. जिथे आवश्यक आहे, तिथे नवीन पाणंद रस्ता देण्याचे प्रयत्न असतील.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी