शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घाम गाळून पिकविलेला माल अडकला शेतातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 14:50 IST

जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून शेतकरी कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करित आहेत; मात्र जिल्ह्यातील बहुतांश पाणंद रस्ते क्षतीग्रस्त होण्यासोबतच या रस्त्यांवर चिखल साचून असल्याने शेतांमध्ये शिल्लक राहिलेला माल घरी आणता येणे अशक्य झाले आहे.शेतकरी, शेतमजूरांचा विविध कामांबाबत महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या समस्या, प्रश्न निकाली निघावेत, यासाठी तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शी व्हावे, या उद्देशाने महाराजस्व अभियानाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. असे असले तरी जिल्ह्यात या अभियानास पूर्णत: खीळ बसली असून शासकीय जमिनीवरील अतीक्रमण काढणे व गाव नकाशानुसार शेतशिवारांमधील अतीक्रमीत रस्ते, पाणंद रस्ते, शिवार रस्ते, शेतांवर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.एकीकडे शेतकऱ्यांचा माल मुंबई, पुणे येथे पाच ते सहा तासात पोहोचविण्यासाठी शासनाकडून रस्त्याचे जाळे निर्माण केले जात असल्याचे भासविण्यात येत आहे; तर दुसरीकडे मात्र शेकडो शेतकºयांच्या शेतांना जोडल्या जाणाºया पाणंद रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली असून खरीप हंगामात पिकलेला शेतमाल घरी आणता येणे यामुळे अशक्य झाल्याने शेतकरी वैतागले आहेत.शिरपूर परिसरात सर्वाधिक समस्या; शेतकरी त्रस्तपाणंद रस्ते नादुरूस्त असण्याची सर्वाधिक समस्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील गावांना जाणवत आहे. शिरपूर-केळी-भेरा, शिरपूर-माणका, शिरपूर-वडप हे पाणंद रस्ते प्रचंड खराब झाले असून जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झालेली आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.शिरपूर येथून केळी, भेरा शेतशिवाराकडे जाणाºया पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चिखलामुळे शेतात ये-जा करणे कठीण झाले असून सोयाबीन अद्यापपर्यंत शेतातच पडून आहे. रब्बी हंगामाची पेरणी देखील यामुळे रखडली आहे. प्रशासनाने रस्त्याची दुरूस्ती करावी.- संजय गोपाळराव देशमुखत्रस्त शेतकरी, शिरपूर

जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत विविध स्वरूपातील कामे सातत्याने सुरू असतात. त्यातूनच पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. जिथे आवश्यक आहे, तिथे नवीन पाणंद रस्ता देण्याचे प्रयत्न असतील.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी