शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कीटकनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:00 IST

कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे.

वाशिम: गतवर्षी अमरावती विभागात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नियमबाह्य अणि बोगस कीटकनाशकाच्या वापरामुळे हा प्रकार घडला. यंदा हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभाग कमालीची दक्षता बाळगून आहे. यासाठी कृषी सेवा केंद्रात विकल्या जाणाऱ्या  कीटकनाशकांची तपासणी करण्याबरोबरच फवारणी यंत्रांचीही गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी केली जात आहे.अमरावती विभागात गतवर्षी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन २०० हून अधिक शेतकºयांचा बळी गेला. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण होते. या प्रकाराची दखल राज्य शासनाने घेऊन कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. या घटनांनंतर काही कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यासह काहींवर कायदेशीर कारवाईसुद्धा झाली होती. आता यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी ७० टक्क्यांहून अधिक आटोपली असून, सुरुवातीच्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. या पिकांवर कुठेकुठे अळ्या, किडींचा प्रादुर्भाव होत असताना शेतकऱ्यांनी फवारणीची लगबग सुरू केली आहे. अशात गतवर्षीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ न निष्पाप बळी जाऊ नयेत म्हणून कृषी विभाग सजग झाला आहे. कृषी सेवा केंद्र प्रमाणित औषधांचीच विक्री करीत आहेत की बनावट आणि जहाल कीटकनाशके विकून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत, याची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. या दरम्यान, परवाना नसलेल्या काही कीटनाशकांच्या विक्रीवर कृषी विभागाने बंदीही घातली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, जहाल कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकºयांचा जीव धोक्यात येऊ नये, याची दक्षता कृषी विभाग बाळगत असून, यासाठीच कृषी सेवा केंद्रांवरील कीटकनाशकांची गुण नियंत्रण पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत परवाना नसलेल्या किंवा जहाल कीटकनाशकांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाईसुद्धा करण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती