शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कृषी स्वावलंबन योजना : अर्जासाठी दोन दिवसांची मुदत; संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:07 IST

ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१९-२० या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ४ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या संपामुळे ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने शेतकरी लाभार्थींची गोची झाली  आहे.अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील शेतकºयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांसाठी  बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना राबविली जात आहे. या योजनेतून नविन विहीरीकरीता २.५० लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत जोडणी व सौर कृषि पंपासाठी १० हजार रुपये, विद्युत पंपसंचसाठी २० हजार रुपये, सुक्ष्म सिंचनाकरीता ९० टक्के मर्यादेत ठिंबक संचासाठी ५० हजार रुपये व तुषार संचासाठी २५ हजार रुपये पूरक अनुदान, शेततळ्याच्या अस्तरीकरणसाठी १ लाख रुपये इत्यादी विविध बाबींसाठी अनुदान मर्यादेत पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या अनुसूचित जातीचे शेतकरी तसेच वनपट्टेधारक आदीवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. परंतू, जिल्ह्यात ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन, त्यानंतर २२ आॅगस्टपासून ग्रामसेवक बेमुदत कामबंद आंदोलनावर आहे. परिणामी, ग्रामसभेचा ठराव मिळत नसल्याने पात्र शेतकरी लाभार्थींना अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. या योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना