शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:21 IST

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी गजानन ढवळे यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: भारत हा कृषीप्रधान देश असून, शेतीतही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. त्याचा लाभ युवकांना व्हावा यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम अनिवार्य करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी केंद्रीय मानव विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे ८ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. गजानन ढवळे यांच्या निवेदनाचा आशय असा की, सद्यस्थितीत शिक्षण घेणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला शासकीय नोकरी अपेक्षित असते. किंवा त्यासाठीच शिक्षण घेतल्या जाते. त्यामुळेच शेतीतून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असताना आणि भारत कृषीप्रधान देश असतानाही शेतीकडे युवकांचे दुर्लक्ष आहे. शिक्षण घेतले म्हणजे हमखास सरकारी नोकरी मिळणार, असा समज अनेकांचा आहे. दुसरीकड सरकारी नोकºयांची संख्या घटल्याने उच्च शिक्षण घेणाºयांत उदासीनता निर्माण झाल्याचे व बेरोजगारी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असल्याचे लक्षात घेऊनच शैक्षणिक धोरण ठरविणे आणि दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कृषीविषयक ज्ञान प्राप्त होऊन शेतीतही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी बेरोजगारीचा आलेख खाली येईल. त्याशिवाय देशभरात शेतीचा विकास साधता येईल. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणात कृषीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशी मागणी शिरपूर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर गजानन ढवळे यांनी मानव विकास संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन