शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाशिम तालुक्यातील गारपीटग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन: शिवसेनेची आक्रमक भूमिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:24 IST

वाशिम:   नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

वाशिम:  गेल्या चार दिवसापासून तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे वाशिम तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा पंचनामा करुन त्यांना शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाशिम तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले असून, त्याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनाचा आशय असा की, गेल्या तीन ते चार दिवसांत वाशिम तालुक्यात जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू, संत्रा आदि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शेतकºयांना कृषी उत्पादनातून कोणतीच आशा उरली नसून, उदरनिर्वाहाची कोणतीच सोय नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्यासह तातडीने अर्थसहाय्य करण्याची गरज आहे. या प्रक्रियेला विलंब झाल्यास शेतकरी निराश होवून आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची भिती व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेत नुकसानग्रस्त पिके व घराचे पंचनामे करुन त्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. तहसिलदारांना निवेदन देतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, तालुका सचिव विजय खानझोडे, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहरप्रमुख नामदेव हजारे, उपतालुकाप्रमुख गजानन इढोळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटShiv Senaशिवसेना