शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

१३ दिवसांनी मंगरुळपीरचा पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:59 IST

मंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात लोकमतने १९ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करून नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.  मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७९४.५३ मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के होते. त्यामुळेच तालुक्यातील जलाशय काठोकाठ भरले आणि यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे दिसू लागले; परंतु वाढलेले रब्बीचे क्षेत्र, पाण्याचा अवैध आणि वारेमा उपसा, तसेच रखरखत्या उन्हामुळे वेगाने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील १५ पैकी निम्मे जलाशय कोरडे पडले. तथापि, मंगरुळपीर शहरासह इतर काही खेडेगावांना पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पात अद्यापही ४० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासियांसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खेडेगावांत पुरेसा पाणी पुरवठाही होत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जोडलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. शहरातील काही हातपंप बंद पडले असताना नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली होती. नगर पालिका प्रशासनाकडून मात्र, यावर तातडीचे उपाय करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसत होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने १९ मार्च रोजीच्या अंकात मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पालिका प्रशासनाचे नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले. प्रशासनानेही तातडीने दखल घेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यात २१ मार्च रोजी पुन्हा शहरातील सांस्कृतिक भवनानजिक जलवाहिनी फुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागला. अखेर शुक्र वार २२ मार्च रोजी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.   जीर्ण जलवाहिनी बदलण्याची मागणी मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाची जलवाहिनी दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांतच फुटण्याचे प्रकार घडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. यंदाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागला. त्यातच फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लीटर पाण्याचा अपव्ययही झाला. त्यावरून जलवाहिनी जीर्ण झाल्याचे स्पष्ट होत असून, ही जलवाहिनी बदलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

मोतसावंगा प्रकल्पावरून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली असून, शुक्रवारपासूनच शहरातील सर्व ठिकाणचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळत पालिकेला सहकार्य करावे. -मिलिंद दारोकारमुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर