शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर बियाणे, खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:19 IST

मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर लागू असलेली संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’मुळे पुरेशा प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी मे अखेर हा प्रश्न पूर्णत: निकाली निघणार असून शेतकºयांनी काळजी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बडगर यांनी केले.जिल्ह्यात ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. त्यात २ लाख ९६ हजार ६० हेक्टर एवढे क्षेत्र सोयाबिन पिकाखालील असून साधारणत: ७७ हजार क्विंटल बियाणे त्यासाठी आवश्यक आहे. त्याचे नियोजन कृषी विभागाकडून केले जात आहे. विशेषत: बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरण्याचे नियोजन करित असल्याने बियाण्याची विशेष अडचण जाणवणार नसल्याची स्थिती आहे.यंदाच्या हंगामात आतापर्यंत महाबिजकडून ४८०० क्विंटल व खासगी कंपण्यांकडून २१९२ असे एकंदरित ६ हजार ९९२ क्विंटल बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ५० हजार मे.टन. रासायनिक खत आवश्यक असून पुणे कृषी आयुक्तालयाकडून ५६ हजार २९० मे.टन. खत साठा मंजूर झालेला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध स्वरूपातील रासायनिक खतांचा २८ हजार २२८ मे.टन. एवढा साठा उपलब्ध असून मे अखेर १४७० मे.टन. युरिया उपलब्ध होणार आहे. तसेच डी.ए.पी. २९६० मे.टन., एम.ओ.पी. १२३० मे.टन., एन.पी.के. ४२२० मे.टन. खत शेतकºयांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकºयांनी काळजी न करता अधिकृत विक्रेत्याकडूनच रासायनिक खत व बियाणे खरेदी करावी. त्याची पक्की पावती जवळ ठेवावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाºयांनी केले. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार, कापूस बीटी बियाणे विक्रीस सद्या मनाई करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रांना तशा सूचना देण्यात आल्या असून कुणीही बीटी बियाण्याची विक्री करू नये, असे कृषी विकास अधिकाºयांनी कळविले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती