शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

वाशिम जिल्ह्यातील वास्तव : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:18 IST

वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देयंदाचा पावसाळाही उलटणार!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या उद्देशाने जलसंधारण विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात २0 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, तर उर्वरितपैकी तीन प्रकल्पांच्या कामांत वन जमिनीच्या संपादनाचा अडथळा निर्माण झाला. अखेर यातील दोन प्रकल्पांना पूर्णत: मान्यता मिळाली. त्याशिवाय  प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकले. अखेर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये कुकसा, मिर्झापूर, सुरकंडी, वडगाव, वाकद, पळसखेड, इंगलवाडी, पंचाळा, पांगराबंदी, स्वासीन, वाडी रायताळ, वारा जहागिर आणि शेलगाव प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी सुरकंडी आणि वडगाव प्रकल्पात पाणीसाठा करून सिंचनासाठी त्याचा वापरही होत असून, या प्रकल्पांचे किरकोळ काम उरले आहे. तथापि, उर्वरित ११ प्रकल्पांचे काम अद्याप बरेच पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या प्रकल्पांची उभारणी सुरू केली तो उद्देश अद्यापही सफल होऊ शकला नाही. प्रशासन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करीत असले तरी, कामे करताना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी आणि कामाचा वेग यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. हे ११ प्रकल्प येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित गावांतील शेतकर्‍यांना सिंचनाचा प्रश्न सुटून पाणी समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम