शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वाशिम जिल्ह्यातील वास्तव : प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:18 IST

वाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देयंदाचा पावसाळाही उलटणार!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या १३ प्रकल्पांची कामे संथगतीने होत आहेत. ही कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांत वारंवार अडथळा येत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ही कामे पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्याच्या उद्देशाने जलसंधारण विभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात २0 हून अधिक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यासाठी संबंधित विभागाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही प्रकल्पांचे काम सुरू झाले, तर उर्वरितपैकी तीन प्रकल्पांच्या कामांत वन जमिनीच्या संपादनाचा अडथळा निर्माण झाला. अखेर यातील दोन प्रकल्पांना पूर्णत: मान्यता मिळाली. त्याशिवाय  प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकले. अखेर या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. यामध्ये कुकसा, मिर्झापूर, सुरकंडी, वडगाव, वाकद, पळसखेड, इंगलवाडी, पंचाळा, पांगराबंदी, स्वासीन, वाडी रायताळ, वारा जहागिर आणि शेलगाव प्रकल्पाचा समावेश आहे. त्यापैकी सुरकंडी आणि वडगाव प्रकल्पात पाणीसाठा करून सिंचनासाठी त्याचा वापरही होत असून, या प्रकल्पांचे किरकोळ काम उरले आहे. तथापि, उर्वरित ११ प्रकल्पांचे काम अद्याप बरेच पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या प्रकल्पांची उभारणी सुरू केली तो उद्देश अद्यापही सफल होऊ शकला नाही. प्रशासन हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कसरत करीत असले तरी, कामे करताना प्रत्यक्ष येणार्‍या अडचणी आणि कामाचा वेग यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. हे ११ प्रकल्प येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित गावांतील शेतकर्‍यांना सिंचनाचा प्रश्न सुटून पाणी समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :washimवाशिम