शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: April 17, 2017 02:24 IST

महसूल विभाग : १७ ते ३० एप्रिलदरम्यान स्वीकारणार तक्रारी, पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न

वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार १७ ते ३० एप्रिल २०१७ या दरम्यान प्रत्येक तहसील कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारींचा निपटारा उपविभाग स्तरावर केला जाणार आहे.दैनंदिन कामकाज करताना नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महसूल विभाग व अन्य प्रशासकीय विभागाकडे प्रलंबित कामाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही काही प्रकरणात न्याय मिळत नाही. पीडितांना न्याय देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिमच्या महसूल विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखला आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागातील रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी १७ ते ३० एप्रिल या दरम्यान तहसील कार्यालय स्तरावर दाखल करता येणार आहेत. प्राप्त तक्रारीनुसार पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.जमीनविषयक प्रकरणे, रेशन, दहावी व बारावीनंतर लागणारी विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे, प्रलंबित असलेले फेरफार, भूसंपादन झाल्यानंतरही मोबदला न मिळणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते व पांदण रस्ते, प्रलंबित कृषीपंप जोडणी, पात्रता असूनही व प्रस्ताव सादर करूनही शासकीय योजनांचा लाभ न मिळणे, यासह प्रलंबित कामांसंदर्भात नागरिकांना या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’च्या माध्यमातून तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी नागरिकांनी १७ ते ३० एप्रिलदरम्यान तहसील स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागात अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर मंगरूळपीर व कारंजा उपविभागात याच पद्धतीने कार्यवाही होणार आहे.पालकमंत्र्यांच्या सूचनांची अंमलबजावणीवाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच जिल्हास्तरीय शासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी ना. राठोड यांनी नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या आहेत, या तक्रारींचा निपटारा कसा करता येईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना ना. राठोड यांनी केल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून १७ एप्रिलपासून तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.