शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हागणदरीमुक्तीसाठी आता कृतीशिल पावले !

By admin | Updated: August 27, 2014 00:11 IST

लोकमानसिकता बदलासाठीचा अँक्शन प्लन तयार करण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर वाशिम

वाशिम : हगणदारी निर्मुलनाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन कामाला लागले आहे. यासंदर्भात लोकमानसिकता बदलासाठीचा अँक्शन प्लन तयार करण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर वाशिम तालुक्यातील वाळकी दोडकीचे सर्वेक्षण करणार्‍या जि. प. प्रशासनाने येत्या मार्चपर्यंत पाणी व स्वच्छतेची व्याप्ती अधिक असलेल्या गावांना आधी निर्मल बनवुन नंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत हागणदारीमुक्तीचा कृती आराखडयानुसार काम करण्याचे नियोजन केले आहे. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आयपीसी अर्थात अंतर व्यक्ति संवाद आणि गृहभेटींवर जास्त भर देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी यापूर्वीच शौचालयाचे अनुदान वाटपासाठी विशेष मोहिम हाती घेउन जिल्हा निर्मल करण्याचा संकल्प केला होता. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन मार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेषत: पाणी व स्वच्छता क्षेत्राशी संबंधित सेवा- सुविधांबाबत मुख्यत: जनजागृती व क्षमता बांधणी संबंधात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गावातील लोकांना शौचालय बांधकाम व शौचालय वापरासाठी प्रेरित करण्यात येते. या कामात अधिक सुसुत्रता यावी म्हणून यापूर्वी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र यामध्ये त्रुटी राहिल्यामुळे अनेक पात्र लोकांना शौचालय बांधकामानंतर प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्‍वभूमिवर गावाची इत्यंभूत माहितीचे संकलन व्हावे आणि त्यानुसार गावात इंटर पर्सनल कम्युनिकेशन अर्थात अंतर व्यक्ती संवाद या नविनतन उपक्रमांचे नियोजन करता यावे या उद्देशाने ग्रामपंचायतींचा कच्चा डाटा संकलीत करुन त्या आधारे त्या ग्रामपंचायतीचा कृती आराखडा बनविण्यात येणार आहे. टप्प्या- टप्प्याने जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतींचा हगणदारी निर्मुलन कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांनी दिली. या कामाला सुरुवात करताना जिल्ह्यातील स्वच्छता आणि पाण्याची व्याप्ती अधिक असलेल्या गावांवर प्राधान्याने हगणदारीमुक्तीसाठी भर दिला जाणार आहे. येत्या मार्चपर्यंत किमान सर्वेक्षणाचे काम आटोपून त्यानंतर येणार्‍या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण हगणदारीमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे काम हाती घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्रृंगारे यांनी स्पष्ट केले.