शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाशिममध्ये नियंत्रण रेषेबाहेरील वाहनांवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 14:48 IST

वाशिम : महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०८ (अ) मधील तरतुदीनुसार वाशिम शहरात बुधवार, १० आॅक्टोबरपासून ‘नो पर्किंग’ नियमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०८ (अ) मधील तरतुदीनुसार वाशिम शहरात बुधवार, १० आॅक्टोबरपासून ‘नो पर्किंग’ नियमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुषंगाने शहरातील मुख्य मार्ग, रहदारीची ठिकाणे व प्रमुख बाजारपेठेत दुचाकी वाहने उभी करण्यासाठी नियंत्रण रेषा आखून देण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध पहिल्याच दिवशी धडक कारवाई करण्यात आली.वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद यासह अन्य मुख्य कार्यालये शहरात वसलेली असल्याने विविध स्वरूपातील कार्यालयीन कामे व बाजारपेठेशी निगडित अन्य कामानिमित्त वाशिम शहराशी परिसरातील सुमारे १०० गावांचा दैनंदिन संबंध येतो. त्यामुळे याठिकाणी कायम नागरिकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असताना मुख्य रस्त्यांवर मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभी केली जायची. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने ‘नो-पार्किंग’ची चोख अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन त्याचा कंत्राट संबंधित अभिकर्त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘नो-पार्किंग’ नियमाची अंमलबजावणी १० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळित राहण्याकरिता जुना गुरांचा बाजार येथील व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा, महात्मा फुले व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा आणि दिघेवाडी चौक, आंबेडकर चौक, पोलिस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, शिवाजी चौक, बालू चौक, गोपाल टॉकीज, जुना रिसोड नाका, अकोला नाका आदीठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे. ठरवून दिलेल्या नियंत्रण रेषेच्या बाहेर वाहन आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. वाहनधारकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस