शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विहिर अधिग्रहण :  ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:02 IST

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.

ठळक मुद्दे ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. . ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

- निनाद देशमुख

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. विहिर अधिग्रहणाच्या ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी अपुºया पावसामुळे यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५७८ गावांत पाणीटंचाई आहे. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी विहिर व बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे तर दुसरीकडे ग्राम पंचायत स्तरावरून पाठविलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या तिव्रतेत अधिकच वाढ होत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले ओत. त्यापैकी केवळ सहा प्रस्ताव मंजूर झाले असून, विहिर अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये धोडप बु. व वाकद येथे प्रत्येकी दोन, वडजी, कन्हेरी या गावांचा समावेश आहे. दोन टँकर प्रस्ताव असून, त्याला मंजूरातही मिळाली. यामध्ये कुºहा व करंजी गरड या दोन गावांचा समावेश आहे. 

तालुक्यातील जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. त्यातही प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळावर मात म्हणून तसेच पाणी उपलब्धतेसंदर्भात तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ गावातही तिव्र पाणीटंचाई असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्चही यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवू शकला नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड