शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विहिर अधिग्रहण :  ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:02 IST

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.

ठळक मुद्दे ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. . ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

- निनाद देशमुख

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. विहिर अधिग्रहणाच्या ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी अपुºया पावसामुळे यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५७८ गावांत पाणीटंचाई आहे. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी विहिर व बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे तर दुसरीकडे ग्राम पंचायत स्तरावरून पाठविलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या तिव्रतेत अधिकच वाढ होत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले ओत. त्यापैकी केवळ सहा प्रस्ताव मंजूर झाले असून, विहिर अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये धोडप बु. व वाकद येथे प्रत्येकी दोन, वडजी, कन्हेरी या गावांचा समावेश आहे. दोन टँकर प्रस्ताव असून, त्याला मंजूरातही मिळाली. यामध्ये कुºहा व करंजी गरड या दोन गावांचा समावेश आहे. 

तालुक्यातील जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. त्यातही प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळावर मात म्हणून तसेच पाणी उपलब्धतेसंदर्भात तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ गावातही तिव्र पाणीटंचाई असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्चही यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवू शकला नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड