शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

विहिर अधिग्रहण :  ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:02 IST

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.

ठळक मुद्दे ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. . ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

- निनाद देशमुख

 रिसोड - रिसोड तालुक्यातील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना आणि प्रस्ताव पाठवूनही तातडीने मंजूरी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. विहिर अधिग्रहणाच्या ४५ पैकी केवळ सहा प्रस्तावांना मंजूरी मिळाल्याने अद्याप ३९ प्रस्ताव धूळखात आहेत. दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी अपुºया पावसामुळे यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ५७८ गावांत पाणीटंचाई आहे. रिसोड तालुक्यातील ७५ पेक्षा जास्त गावांत पाणीटंचाई तिव्र बनली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी विहिर व बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केले आहे तर दुसरीकडे ग्राम पंचायत स्तरावरून पाठविलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजूरी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या तिव्रतेत अधिकच वाढ होत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतींकडून ४५ बोअर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले ओत. त्यापैकी केवळ सहा प्रस्ताव मंजूर झाले असून, विहिर अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये धोडप बु. व वाकद येथे प्रत्येकी दोन, वडजी, कन्हेरी या गावांचा समावेश आहे. दोन टँकर प्रस्ताव असून, त्याला मंजूरातही मिळाली. यामध्ये कुºहा व करंजी गरड या दोन गावांचा समावेश आहे. 

तालुक्यातील जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. त्यातही प्रस्तावित उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळावर मात म्हणून तसेच पाणी उपलब्धतेसंदर्भात तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ गावातही तिव्र पाणीटंचाई असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्चही यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागवू शकला नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड