शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाने घेतला वेग; वाशिम जिल्ह्यात ६० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:04 IST

मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समाविष्ट समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात चांगलीच गती आली आहे. मार्गाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, या मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे,नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पाच पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. प्रकल्पाच्या पॅकेज २ मध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थात पॅकेज २ अमरावती जिल्ह्यातून सुरू झाला आहे. या पॅकेजमध्ये पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जात आहे. पॅकेज २ अंतर्गत या मार्गावर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि कारंजा सोहळ अभयारण्य येत असल्याने हा भाग पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर आहे. पॅकेज २ मधील या प्रस्तावित महामार्गाचा एक भाग अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो. ही बाब निदर्शनास येताच समृद्धी महामार्गाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे अभयारण्याचे नुकसान होऊ नये म्हणून महामार्ग यापुढे काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामार्गे जाणार नाही, तर बाहेरून जाईल. भविष्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये, या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पॅकेज २ मध्ये पर्यावरणाला संतुलित अशा उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. नद्यांच्या आणि वृक्षरोपणासारख्या नैसर्गिक स्रोतांचे नुकसान होऊ नये म्हणून, पॅकेज २ मधील प्रस्तावित महामार्गाच्या बांधकामात पुढील काळजी घेतली जात आहे. या पॅकेज अंतर्गत एकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. याव्यतिरिक्त, एकूण २६ लोअर वाहनांच्या अंडरपास तयार केल्या जात आहेत, तसेच पादचारी आणि प्राण्यांसाठी १८५ खास अंडरपास असून, वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या अंडरपासेसची कामे वेगात सुरू आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwashimवाशिम