शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाने घेतला वेग; वाशिम जिल्ह्यात ६० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:04 IST

मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समाविष्ट समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात चांगलीच गती आली आहे. मार्गाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, या मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे,नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पाच पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. प्रकल्पाच्या पॅकेज २ मध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थात पॅकेज २ अमरावती जिल्ह्यातून सुरू झाला आहे. या पॅकेजमध्ये पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जात आहे. पॅकेज २ अंतर्गत या मार्गावर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि कारंजा सोहळ अभयारण्य येत असल्याने हा भाग पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर आहे. पॅकेज २ मधील या प्रस्तावित महामार्गाचा एक भाग अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो. ही बाब निदर्शनास येताच समृद्धी महामार्गाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे अभयारण्याचे नुकसान होऊ नये म्हणून महामार्ग यापुढे काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामार्गे जाणार नाही, तर बाहेरून जाईल. भविष्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये, या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पॅकेज २ मध्ये पर्यावरणाला संतुलित अशा उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. नद्यांच्या आणि वृक्षरोपणासारख्या नैसर्गिक स्रोतांचे नुकसान होऊ नये म्हणून, पॅकेज २ मधील प्रस्तावित महामार्गाच्या बांधकामात पुढील काळजी घेतली जात आहे. या पॅकेज अंतर्गत एकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. याव्यतिरिक्त, एकूण २६ लोअर वाहनांच्या अंडरपास तयार केल्या जात आहेत, तसेच पादचारी आणि प्राण्यांसाठी १८५ खास अंडरपास असून, वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या अंडरपासेसची कामे वेगात सुरू आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwashimवाशिम