शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाने घेतला वेग; वाशिम जिल्ह्यात ६० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:04 IST

मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे.

ठळक मुद्देएकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात समाविष्ट समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात चांगलीच गती आली आहे. मार्गाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, या मार्गालगत येणाऱ्या गावानजीक पादचारी आणि प्राण्यांसाठी अंडरपासेसच्या उभारणीला वेग देण्यात आला आहे,नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पाच पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. प्रकल्पाच्या पॅकेज २ मध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थात पॅकेज २ अमरावती जिल्ह्यातून सुरू झाला आहे. या पॅकेजमध्ये पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जात आहे. पॅकेज २ अंतर्गत या मार्गावर वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि कारंजा सोहळ अभयारण्य येत असल्याने हा भाग पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर आहे. पॅकेज २ मधील या प्रस्तावित महामार्गाचा एक भाग अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून जातो. ही बाब निदर्शनास येताच समृद्धी महामार्गाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे अभयारण्याचे नुकसान होऊ नये म्हणून महामार्ग यापुढे काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामार्गे जाणार नाही, तर बाहेरून जाईल. भविष्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये, या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पॅकेज २ मध्ये पर्यावरणाला संतुलित अशा उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. नद्यांच्या आणि वृक्षरोपणासारख्या नैसर्गिक स्रोतांचे नुकसान होऊ नये म्हणून, पॅकेज २ मधील प्रस्तावित महामार्गाच्या बांधकामात पुढील काळजी घेतली जात आहे. या पॅकेज अंतर्गत एकूण ६० वाहने अंडरपास आणि वाहनांचे ओव्हरपास तयार केले जात आहेत. याव्यतिरिक्त, एकूण २६ लोअर वाहनांच्या अंडरपास तयार केल्या जात आहेत, तसेच पादचारी आणि प्राण्यांसाठी १८५ खास अंडरपास असून, वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या अंडरपासेसची कामे वेगात सुरू आहेत. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गwashimवाशिम