शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:45 PM

अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधार कार्डपासून वंचित असलेल्या आणि दुरूस्ती करण्यासाठी ची गरज असलेल्या नागरिकांसाठी आता नवी अट ठेवण्यात आली आहे. दहावीपेक्षा कमी शिकलेल्या किंवा अशिक्षीत लोकांना जन्मतारखेच्या पुराव़्यासाठी राजपत्रित अधिकारी, आमदार, खासदारांच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.जिल्ह्यातील नागरिकांची आधार नोंदणी जवळपास पूर्ण झालेली असली तरी, काही नागरिकांची नोंदणी अद्याप शिल्लक आहे, तर पूर्वी काढण्यात आलेल्या आधारकार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांची आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी धडपड सुरू आहे. आधार नोंदणीसाठी आधीच जिल्ह्यात मर्यादित केंद्र असताना ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ काही नव्या अटी लागू केल्या आहेत. या अटींमध्ये प्रामुख्याने आधार नोंदणी करण्याची आणि जन्मतारखेतील दुुरुस्ती करण्याची अट खुप किचकट आहे. यात दहावी किंवा त्यापुढे शिक्षण घेतलेल्या नागरिकांना आधार नोंदणी किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडणे पुरेसे आहे. तथापि, ज्या लोकांचे शिक्षण हे दहावीपेक्षा कमी आहे किंवा जे अशिक्षित आहेत. अशा लोकांना जन्मतारखेबाबत राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा आमदार, खासदाच्या लेटर हेडवरील स्वाक्षरीसह दाखला जोडणे बंधनकारक केले आहे. या अटीचे पालन न करता नोंदणी करणाºया केंद्रचालकाला याचा भुर्दंड सोसावा लागत आहेच शिवाय संबंधित व्यक्तीची नोंदणीही रद्द होत आहे. आवश्यक दाखला न जोडल्यामुळे अनेक व्यक्तींची आधार नोंदणी रद्दही होत आहे. आता आमदार, खासदारांचा दाखला मिळविणे सर्वसाधारण लोकांना कठीण जातेच शिवाय राजपत्रित अधिकारी असलेल्या तहसीलदारांकडूनही वेळेत दाखला मिळण्यात अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकरी मानधन योजनेसह शेतकरी सन्मान योजनेत नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे; परंतु पूर्वीच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना नव्याने आधार नोंदणी करावी लागत आहे; परंतु ‘यूआयडी’च्या अटीमुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

जन्मतारखेत एकदाच होणार बदल‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ केवळ जन्मतारखेसाठी दाखल्याचीच अट घातलेली नाही, तर जन्मतारखेतील बदलाच्या प्रमाणावरही मर्यादा आणली आहे. नव्या अटीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकातील जन्मतारीख एकदाच बदलता येणार आहे. त्यातही जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा कमी फरकाचा बदल जिल्हास्तरावर आवश्यक कागदपत्रातून होणार आहे; परंतु त्यापेक्षा अधिक फरकाचा बदल करावयाचा असल्यास संबंधित व्यक्तीला थेट मुंबई येथील ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडिया’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

आधार क्रमांक नोंदणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नियम व अटी ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाच्यावतीनेच लागू करण्यात आल्या आहेत. या अटी देशभरात लागू आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आपणाला यात काहीच करता येत नाही.- सागर भुतडाजिल्हा समन्वयकमहाआॅनलाईन, वाशिम

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwashimवाशिम