शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:46 IST

अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधार कार्डपासून वंचित असलेल्या आणि दुरूस्ती करण्यासाठी ची गरज असलेल्या नागरिकांसाठी आता नवी अट ठेवण्यात आली आहे. दहावीपेक्षा कमी शिकलेल्या किंवा अशिक्षीत लोकांना जन्मतारखेच्या पुराव़्यासाठी राजपत्रित अधिकारी, आमदार, खासदारांच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.जिल्ह्यातील नागरिकांची आधार नोंदणी जवळपास पूर्ण झालेली असली तरी, काही नागरिकांची नोंदणी अद्याप शिल्लक आहे, तर पूर्वी काढण्यात आलेल्या आधारकार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांची आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी धडपड सुरू आहे. आधार नोंदणीसाठी आधीच जिल्ह्यात मर्यादित केंद्र असताना ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ काही नव्या अटी लागू केल्या आहेत. या अटींमध्ये प्रामुख्याने आधार नोंदणी करण्याची आणि जन्मतारखेतील दुुरुस्ती करण्याची अट खुप किचकट आहे. यात दहावी किंवा त्यापुढे शिक्षण घेतलेल्या नागरिकांना आधार नोंदणी किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडणे पुरेसे आहे. तथापि, ज्या लोकांचे शिक्षण हे दहावीपेक्षा कमी आहे किंवा जे अशिक्षित आहेत. अशा लोकांना जन्मतारखेबाबत राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा आमदार, खासदाच्या लेटर हेडवरील स्वाक्षरीसह दाखला जोडणे बंधनकारक केले आहे. या अटीचे पालन न करता नोंदणी करणाºया केंद्रचालकाला याचा भुर्दंड सोसावा लागत आहेच शिवाय संबंधित व्यक्तीची नोंदणीही रद्द होत आहे. आवश्यक दाखला न जोडल्यामुळे अनेक व्यक्तींची आधार नोंदणी रद्दही होत आहे. आता आमदार, खासदारांचा दाखला मिळविणे सर्वसाधारण लोकांना कठीण जातेच शिवाय राजपत्रित अधिकारी असलेल्या तहसीलदारांकडूनही वेळेत दाखला मिळण्यात अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकरी मानधन योजनेसह शेतकरी सन्मान योजनेत नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे; परंतु पूर्वीच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना नव्याने आधार नोंदणी करावी लागत आहे; परंतु ‘यूआयडी’च्या अटीमुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

जन्मतारखेत एकदाच होणार बदल‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ केवळ जन्मतारखेसाठी दाखल्याचीच अट घातलेली नाही, तर जन्मतारखेतील बदलाच्या प्रमाणावरही मर्यादा आणली आहे. नव्या अटीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकातील जन्मतारीख एकदाच बदलता येणार आहे. त्यातही जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा कमी फरकाचा बदल जिल्हास्तरावर आवश्यक कागदपत्रातून होणार आहे; परंतु त्यापेक्षा अधिक फरकाचा बदल करावयाचा असल्यास संबंधित व्यक्तीला थेट मुंबई येथील ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडिया’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

आधार क्रमांक नोंदणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नियम व अटी ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाच्यावतीनेच लागू करण्यात आल्या आहेत. या अटी देशभरात लागू आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आपणाला यात काहीच करता येत नाही.- सागर भुतडाजिल्हा समन्वयकमहाआॅनलाईन, वाशिम

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwashimवाशिम