शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहावी अनुत्तीर्ण, अशिक्षितांची आधार नोंदणीत गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:46 IST

अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आधार कार्डपासून वंचित असलेल्या आणि दुरूस्ती करण्यासाठी ची गरज असलेल्या नागरिकांसाठी आता नवी अट ठेवण्यात आली आहे. दहावीपेक्षा कमी शिकलेल्या किंवा अशिक्षीत लोकांना जन्मतारखेच्या पुराव़्यासाठी राजपत्रित अधिकारी, आमदार, खासदारांच्या दाखल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांची नोंदणी रद्द झाली असून, दाखला मिळविण्यात अडचणी येत असल्याने त्यांची गोची झाली आहे.जिल्ह्यातील नागरिकांची आधार नोंदणी जवळपास पूर्ण झालेली असली तरी, काही नागरिकांची नोंदणी अद्याप शिल्लक आहे, तर पूर्वी काढण्यात आलेल्या आधारकार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांची आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी धडपड सुरू आहे. आधार नोंदणीसाठी आधीच जिल्ह्यात मर्यादित केंद्र असताना ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ काही नव्या अटी लागू केल्या आहेत. या अटींमध्ये प्रामुख्याने आधार नोंदणी करण्याची आणि जन्मतारखेतील दुुरुस्ती करण्याची अट खुप किचकट आहे. यात दहावी किंवा त्यापुढे शिक्षण घेतलेल्या नागरिकांना आधार नोंदणी किंवा जन्मतारखेतील दुरुस्ती करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला जोडणे पुरेसे आहे. तथापि, ज्या लोकांचे शिक्षण हे दहावीपेक्षा कमी आहे किंवा जे अशिक्षित आहेत. अशा लोकांना जन्मतारखेबाबत राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र किंवा आमदार, खासदाच्या लेटर हेडवरील स्वाक्षरीसह दाखला जोडणे बंधनकारक केले आहे. या अटीचे पालन न करता नोंदणी करणाºया केंद्रचालकाला याचा भुर्दंड सोसावा लागत आहेच शिवाय संबंधित व्यक्तीची नोंदणीही रद्द होत आहे. आवश्यक दाखला न जोडल्यामुळे अनेक व्यक्तींची आधार नोंदणी रद्दही होत आहे. आता आमदार, खासदारांचा दाखला मिळविणे सर्वसाधारण लोकांना कठीण जातेच शिवाय राजपत्रित अधिकारी असलेल्या तहसीलदारांकडूनही वेळेत दाखला मिळण्यात अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या शेतकरी मानधन योजनेसह शेतकरी सन्मान योजनेत नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे; परंतु पूर्वीच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्याने त्यांना नव्याने आधार नोंदणी करावी लागत आहे; परंतु ‘यूआयडी’च्या अटीमुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

जन्मतारखेत एकदाच होणार बदल‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाने’ केवळ जन्मतारखेसाठी दाखल्याचीच अट घातलेली नाही, तर जन्मतारखेतील बदलाच्या प्रमाणावरही मर्यादा आणली आहे. नव्या अटीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकातील जन्मतारीख एकदाच बदलता येणार आहे. त्यातही जन्मतारखेत तीन वर्षांपेक्षा कमी फरकाचा बदल जिल्हास्तरावर आवश्यक कागदपत्रातून होणार आहे; परंतु त्यापेक्षा अधिक फरकाचा बदल करावयाचा असल्यास संबंधित व्यक्तीला थेट मुंबई येथील ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडिया’च्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

आधार क्रमांक नोंदणी किंवा दुरुस्ती संदर्भातील नियम व अटी ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडियाच्यावतीनेच लागू करण्यात आल्या आहेत. या अटी देशभरात लागू आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आपणाला यात काहीच करता येत नाही.- सागर भुतडाजिल्हा समन्वयकमहाआॅनलाईन, वाशिम

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwashimवाशिम