शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दोन चिमुकल्या मुलींसह मातेची विहिरीत उडी; धक्कादायक घटनेनं गावावर शोककळा

By सुनील काकडे | Updated: April 14, 2023 22:35 IST

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला

वाशिम : दारूड्या पतीकडून सातत्याने होणारा त्रास असह्य झाल्याने अखेर विवाहित महिलेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतली. या घटनेत दोन्ही निष्पाप मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील रेगाव (ता.मालेगाव) येथे शुक्रवार, १४ एप्रिल रोजी ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, रेगाव येथील बबन कांबळे यांची मोठी मुलगी आरतीचा विवाह काही वर्षांपूर्वी विकास गवई याच्याशी झाला. या दाम्पत्यास दोन मुली झाल्या. दरम्यान, विकासला जडलेले दारूचे व्यसन काही केल्या सुटले नाही. दारू पिऊन आल्यानंतर तो आरतीचा छळ करायचा. त्याला कंटाळून ती ८ दिवसांपूर्वी दोन्ही मुलींना घेऊन माहेरी, रेगाव येथे आली होती.

१४ एप्रिल रोजी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू असताना दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आरतीने दोन्ही मुलींना सोबत घेऊन गावाबाहेर जाताना दिलीप घुगे यांनी वडिल बबन कांबळे यांना सांगितले. त्यानंतर बराचवेळ शोधाशोध केली; मात्र आरती आणि दोन्ही मुलींचा पत्ता लागला नाही. यादरम्यान रेगाव शिवारातील समृद्धी महामार्गाजवळ सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामानजिक गजानन घुगे यांच्या विहिरीत आरतीने दोन्ही मुलींना विहिरीत फेकून देत स्वत:ही उडी घेतल्याचे समजले. तेथे काम करणाऱ्यांनी आरतीला जिवंत बाहेर काढले; मात्र दोन्ही मुलींचा मृतदेहच हाती आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी बबन कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलींच्या मृत्यूस कारणीभूत आरती विकास गवई हिच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ करीत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWomenमहिलाFarmerशेतकरी