शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

By संतोष वानखडे | Updated: September 17, 2023 16:58 IST

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले.

वाशिम : सततची नापीकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या एका शेतकऱ्याने १७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. संदीप नारायण राठोड (४०) रा. गव्हा (ता.मानोरा) असे मृतकाचे नाव आहे.

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. त्यात घर खर्च चालविण्यासाठी खासगी सावकाराकडूनही पैसे घेतलेले होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

खासगी सावकाराकडून व बँकेकडून पैसे भरण्यासाठी तगादा सुरू झाला आणि इकडे सततच्या नापिकीमुळे हाती पैसा येत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? याची चिंता सतावत होती. यातूनच शेवटी संदीप राठोड यांनी संजय देशमुख यांचे शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

१७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजतादरम्यान संदीप राठोड यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतकाचे काका भीमराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार जावेद करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम