शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

By संतोष वानखडे | Updated: September 17, 2023 16:58 IST

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले.

वाशिम : सततची नापीकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या एका शेतकऱ्याने १७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. संदीप नारायण राठोड (४०) रा. गव्हा (ता.मानोरा) असे मृतकाचे नाव आहे.

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. त्यात घर खर्च चालविण्यासाठी खासगी सावकाराकडूनही पैसे घेतलेले होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.

खासगी सावकाराकडून व बँकेकडून पैसे भरण्यासाठी तगादा सुरू झाला आणि इकडे सततच्या नापिकीमुळे हाती पैसा येत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? याची चिंता सतावत होती. यातूनच शेवटी संदीप राठोड यांनी संजय देशमुख यांचे शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

१७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजतादरम्यान संदीप राठोड यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतकाचे काका भीमराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार जावेद करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिम