शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हयातीच्या दाखल्यामुळे ९६ हजार निराधारांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे ९६ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यात श्रावण बाळ निराधार योजनेचे ४६ हजार, इंदिरा ...

वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे ९६ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यात श्रावण बाळ निराधार योजनेचे ४६ हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे १८५०० आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ३१ हजार ५०० लाभार्थींचा समावेश आहे. या निराधारांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्ष अखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार हयातीचा दाखला मिळविण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात. आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे. दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळविणे मोठे कठीण होणार आहे. त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतेच मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पुढे शासनाने फर्मान सोडल्यास हयातीच्या दाखल्याअभावी त्यांचे मानधन रखडून त्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती आहे.

-----------

कोट: शासनाने निराधारांना हयातीचा दाखला देण्यासाठी मुदत वाढविली आहे. नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू नसून, निराधारांसाठीच्या सर्वच योजनांतील लाभार्थींना निधी मिळताच त्यांचे मानधन तत्काळ अदा केले जात आहे. अद्याप कोणत्याच लाभार्थीचे मानधन दाखल्याअभावी थांबविण्यात आले नाही किंवा दाखला सादर करण्याची अटही घालण्यात आली नाही.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

-----------

कोट: गेल्या काही महिन्यांपूर्वी हयातीच्या दाखल्याअभावी आमचे मानधन थांबले होते. मी दोन वेळा दाखला सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांकडे विनंती केली. तेव्हा कुठे मानधन सुरू झाले. आता नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत आपणांस काहीच माहिती नाही. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला माहिती देऊन दाखला मिळविण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि आमची परवड थांबवावी, अशी अपेक्षा आहे.

-कृष्णाबाई खैरे,

लाभार्थी, संजय गांधी निराधार

-------------------

बँक प्रशासन अनभिज्ञ

निराधार योजनांच्या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे निराधारांना हे प्रमाणपत्र सादर करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी, दाखला कसा मिळवावा, याबाबत कोणती माहिती देण्यात आली नाही. त्यातच यासंदर्भात बँकांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. बँकेचा हयातीच्या दाखल्याशी कोणताही संबंध नसून, तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्ष लाभार्थीच काढू शकतो, असे सांगण्यात आले.