शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

हयातीच्या दाखल्यामुळे ९६ हजार निराधारांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे ९६ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यात श्रावण बाळ निराधार योजनेचे ४६ हजार, इंदिरा ...

वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे ९६ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यात श्रावण बाळ निराधार योजनेचे ४६ हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे १८५०० आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ३१ हजार ५०० लाभार्थींचा समावेश आहे. या निराधारांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्ष अखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार हयातीचा दाखला मिळविण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात. आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे. दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळविणे मोठे कठीण होणार आहे. त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतेच मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पुढे शासनाने फर्मान सोडल्यास हयातीच्या दाखल्याअभावी त्यांचे मानधन रखडून त्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती आहे.

-----------

कोट: शासनाने निराधारांना हयातीचा दाखला देण्यासाठी मुदत वाढविली आहे. नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू नसून, निराधारांसाठीच्या सर्वच योजनांतील लाभार्थींना निधी मिळताच त्यांचे मानधन तत्काळ अदा केले जात आहे. अद्याप कोणत्याच लाभार्थीचे मानधन दाखल्याअभावी थांबविण्यात आले नाही किंवा दाखला सादर करण्याची अटही घालण्यात आली नाही.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

-----------

कोट: गेल्या काही महिन्यांपूर्वी हयातीच्या दाखल्याअभावी आमचे मानधन थांबले होते. मी दोन वेळा दाखला सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांकडे विनंती केली. तेव्हा कुठे मानधन सुरू झाले. आता नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत आपणांस काहीच माहिती नाही. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला माहिती देऊन दाखला मिळविण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि आमची परवड थांबवावी, अशी अपेक्षा आहे.

-कृष्णाबाई खैरे,

लाभार्थी, संजय गांधी निराधार

-------------------

बँक प्रशासन अनभिज्ञ

निराधार योजनांच्या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे निराधारांना हे प्रमाणपत्र सादर करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी, दाखला कसा मिळवावा, याबाबत कोणती माहिती देण्यात आली नाही. त्यातच यासंदर्भात बँकांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. बँकेचा हयातीच्या दाखल्याशी कोणताही संबंध नसून, तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्ष लाभार्थीच काढू शकतो, असे सांगण्यात आले.