शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

जिल्ह्यातील ९ हजार मजुरांना मिळाले गावातच काम; ग्रामीण भागात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु

By दिनेश पठाडे | Updated: June 18, 2023 17:01 IST

विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते.

वाशिम : उन्हाळ्यात कामाच्या शोधात मजुरांची होणारे स्थलांतर थांबावे यासाठी गावातच काम सुरु करुन ९ हजारांना मजुरांना गावातच काम उपलब्ध करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना गावातच काम मिळावे, त्यांचे स्थलांतर थांबावे सोबतच विविध विकासात्मक कामे मार्गी लागावीत, या हेतूने योजना राबविली जाते. यामुळे अकुशल लाभार्थ्यांना गावातच रोजगार मिळतो.

विशेष म्हणजे, १०० दिवसांपर्यंत रोजगाराचे काम मजुरांना मिळते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. बोगसगिरीला चाप बसावा, गरजू मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यासाठी  रोजगार हमी योजनेच्या कार्यपद्धतीत बदल केले जात आहेत. सार्वजनिक कामावरील मजुरांच्या हजेरीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे, तसेच जॉबकार्डधारकांचे आधार लिंक करण्यात आले. यासह इतर उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांना हवे ते काम योजनेंतर्गत उपलब्ध केले जाते. ग्रामीण भागात उन्हाळ्यात कामाचा तुटवडा असतो. मजुरांना काम उपलब्ध नसल्याने त्यांना कामाच्या शोधात इतरत्र जावे लागते. त्यामुळे गावातच काम उपलब्ध करुन दिले जाते. यासाठी मजुरांना काम मागणी अर्ज करणे आवश्यक ठरते. मजुरांना काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावर कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात विविध यंत्रणेची १३९० कामे सुरु असून त्यावर ९ हजार ८६ मजूर काम हजर असल्याचे रविवारच्या ऑनलाइन मस्टरवरुन पहायला मिळाले.२२९ ग्रामपंचायतीमध्ये विविध कामे

जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीपैकी २२९ ग्रामपंचायती अंतर्गत विविध यंत्रणेची  १३९० कामे सुरु आहेत. यामध्ये फळबाग लागवड, सिंचन विहीर, घरकूल, पाणंद रस्ता आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी