शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात ९२४९ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:43 IST

वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्य शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातर्गंत जिल्ह्यात मागील चार वर्षांत ४६९ गावांत विविध यंत्रणेमार्फत ९२४९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून ६७ हजार ३६२ दशलक्ष घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून, या आधारे १ लाख १० हजार ५५२ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्हयातील शेतकरी आता ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन पिकांचे उत्पन्न घेत आहे. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील २०० गावांची निवड पहिल्या वर्षी करण्यात आली. या गावातील शेत शिवारात २२ हजार ६०८ हेक्टरवर ५०५७ कामे पूर्ण करण्यात आली. यामधून ३४ हजार ४१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. या पाण्यातून ६८ हजार ८३४ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१६-१७ या वर्षात १४९ गावांची निवड करण्यात आली. या गावातील शिवारात ८३४३ हेक्टरवर २०६९ कामे पुर्ण करण्यात आली. यामधून २२, ७८६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यातून ३३,१७८ हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१७-१८ या वर्षात १२०गावात २१२३ कामे ८७९६ हेक्टरवर करण्यात आली. यामधून १०हजार १५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला. यामधून ८५४० संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण झाली. सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये ३१२४ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी २७४ कामे १३३ हेक्टरवर पूर्ण करण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी