शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पश्चिम वऱ्हाडात वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:55 IST

वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ८८ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. कमी पाऊस झाल्याने पश्चिम वऱ्हाडात पाणीटंचाईची समस्या जाणवण्याची भिती वर्तविली जात आहे.पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात गत काही वर्षांत पावसाची सरासरी ही कमीच राहिली आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर जुलैच्या मध्यंतरापर्यंत अधूनमधून चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे यंदा या तिन्ही जिल्ह्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली; परंतु जुलैच्या मध्यंतरानंतर पावसाने खंड दिला, तर आॅगस्टच्या मध्यंतरी जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी दिसू लागले. परतीच्या पावसाने पश्चिम वºहाडात हजेरी लावल्यानंतर अकोला जिल्ह्यात पावसाने कशीबशी वार्षिक सरासरी गाठली. या जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत १००.६२ टक्के पाऊस पडला. तर वाशिम जिल्ह्यात ९६ टक्के पावसाची नोंद झाली; परंतु बुलडाणा जिल्ह्यात केवळ ६९.६९ टक्केच पावसाची नोंद झालेली आहे. या तिन्ही जिल्ह्यांची एकंदरीत सरासरी काढल्यास २८ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे.आठ तालुक्यांची स्थिती गंभीरपश्चिम वऱ्हाडात २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची सरासरी ८८ टक्के असली तरी, ८ तालुक्यात ७५ टक्केही पाऊस पडलेला नाही. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (६३. ८१) टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव (४९.६३), नांदुरा (५३.६२), शेगाव (६२.५४), देऊळगाव राजा (६३.८७), संग्रामपूर (६६.८५), चिखली (७०.११) आणि मोताळा (७३.०९) या तालुक्यांचा समावेश आहे. पावसाची सरासरी लक्षात घेता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात या आठही तालुक्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमAkolaअकोलाbuldhanaबुलडाणाmonsoon 2018मान्सून 2018