शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

७५४२६ शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत ...

वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. १५ जुलै अंतिम मुदत असून, मुदतवाढ मिळेल की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरिता जनजागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी बँक, सामूहिक सुविधा केंद्र, कृषी केंद्र तसेच ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात या योजनेचे पोस्टरही लावण्यात आले. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नसल्याचे दिसून येते. १४ जुलैपर्यंत ४१७६ कर्जदार आणि ७१२५० बिगर कर्जदार अशा एकूण ७५४२६ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत आहे. १५ जुलैनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

000०००

कर्जदार शेतकरी ४१७६

बिगर कर्जदार शेतकरी ७१२५०

विमा संरक्षित क्षेत्र ५५४३९

शेतकऱ्यांची विमा रक्कम ४.८३ कोटी

राज्य सरकारची विमा रक्कम १३.२९ कोटी

केंद्र सरकारची विमा रक्कम १३.२९ कोटी

००००

कोट

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा उतरविता येणार आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ४२६ शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम