शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:46 IST

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र१0 गावांत टँकरने पाणी पुरवठा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. परिणामी त्यांनी हिवाळय़ातच तळ गाठला. त्यातच भूजल पातळी पावणेदोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने कूपनलिका आणि हजारो दैनंदिन वापरातील विहिरीही आटल्याने जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१0 गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यातील बहुतांश गावांसाठी स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना असल्या तरी, काही गावांतील स्थिती विदारक झाली आहे. पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजना आखल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विहीर अधिग्रहणाचा समावेश असून, अत्यावश्यक बाब म्हणून टँकरचाही आधार घेतला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ वाशिम तालुक्याला बसत असल्याचे दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने इतरही उपाय योजनांची तयारी केली आहे.  

टँकरची संख्या वाढण्याची शक्यता सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींच्या अधिग्रहणावर भर देण्यात येत असला तरी, विहिरींअभावी पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावांसाठी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या १0 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मानोरा तालुक्यात सर्वाधिक ४, तर कारंजा, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अद्याप रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात टँकरची गरज भासली नाही; परंतु येत्या काही दिवसांत पाणीटंचाई तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई