शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:46 IST

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र१0 गावांत टँकरने पाणी पुरवठा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. परिणामी त्यांनी हिवाळय़ातच तळ गाठला. त्यातच भूजल पातळी पावणेदोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने कूपनलिका आणि हजारो दैनंदिन वापरातील विहिरीही आटल्याने जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१0 गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यातील बहुतांश गावांसाठी स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना असल्या तरी, काही गावांतील स्थिती विदारक झाली आहे. पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजना आखल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विहीर अधिग्रहणाचा समावेश असून, अत्यावश्यक बाब म्हणून टँकरचाही आधार घेतला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ वाशिम तालुक्याला बसत असल्याचे दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने इतरही उपाय योजनांची तयारी केली आहे.  

टँकरची संख्या वाढण्याची शक्यता सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींच्या अधिग्रहणावर भर देण्यात येत असला तरी, विहिरींअभावी पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावांसाठी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या १0 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मानोरा तालुक्यात सर्वाधिक ४, तर कारंजा, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अद्याप रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात टँकरची गरज भासली नाही; परंतु येत्या काही दिवसांत पाणीटंचाई तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई