शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वाशिम जिल्ह्यात ७१ टंचाईग्रस्त गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:46 IST

वाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र१0 गावांत टँकरने पाणी पुरवठा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या अपुर्‍या पावसामुळे जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र होत आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहणही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आवश्यकतेनुसार अधिक वाढणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. परिणामी त्यांनी हिवाळय़ातच तळ गाठला. त्यातच भूजल पातळी पावणेदोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने कूपनलिका आणि हजारो दैनंदिन वापरातील विहिरीही आटल्याने जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ५१0 गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. यातील बहुतांश गावांसाठी स्थानिक पातळीवर पर्यायी उपाययोजना असल्या तरी, काही गावांतील स्थिती विदारक झाली आहे. पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजना आखल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने विहीर अधिग्रहणाचा समावेश असून, अत्यावश्यक बाब म्हणून टँकरचाही आधार घेतला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७१ गावांसाठी ७५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, १0 गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ वाशिम तालुक्याला बसत असल्याचे दिसत आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने इतरही उपाय योजनांची तयारी केली आहे.  

टँकरची संख्या वाढण्याची शक्यता सद्यस्थितीत जिल्ह्यात विहिरींच्या अधिग्रहणावर भर देण्यात येत असला तरी, विहिरींअभावी पाणीटंचाईचा सामना करणार्‍या गावांसाठी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या १0 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मानोरा तालुक्यात सर्वाधिक ४, तर कारंजा, वाशिम आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अद्याप रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात टँकरची गरज भासली नाही; परंतु येत्या काही दिवसांत पाणीटंचाई तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई