शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

वाशिम जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी लाभार्थींना मिळणार धान्याऐवजी पैसे

By दिनेश पठाडे | Updated: March 1, 2023 17:57 IST

शेतकरी कुटुंबांना दिलासा: एपीएलचे १८२९९ कार्डधारक

दिनेश पठाडे, वाशिम: राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण केली करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारी रोजी घेतला आहे. त्यात वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश असून जिल्ह्यातील १८ हजार २९९ कार्डवरील ७० हजार २५२ लाभार्थींना धान्यऐवजी पैसे मिळणार असून प्रती लाभार्थी १५० रुपये त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. जानेवारी २०२३ पासून लाभ दिला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए योजनेंतर्गत गहू २२ रुपये प्रती किलो व तांदुळ २३ रुपये प्रती किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे २०२२ आणि १ सप्टेंबर २०२२ रोजी पत्राद्वारे कळवले होते. ही बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

या योजनेचा हजारो लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सर्व तालुका पुरवठा विभागांना १ मार्च रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत.

एपीएल शेतकरी योजना तालुकानिहाय लाभार्थी

तालुका--कार्ड संख्या--लाभार्थी संख्या

वाशिम -३२२०--१३४२४मालेगाव--२७९४--१०१२०रिसोड--२०९४--७५६९मंगरुळपीर--५१३७-१८४१६कारंजा--३८०२--१६२१३मानोरा--१२५२--४५१०

लाभार्थींना करावा लागणार अर्ज

रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता आरसीएमएस वर नोंद असलेल्या संबंधित पात्र शिधापत्रिकारधारकांना डीबीटी साठी आवश्यक असलेला बँक खात्यांचा तपशिलासह ऑफलाइन अथवा ऑनलाइन अर्ज पुरवठा विभागाकडून करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन आधार लिंक असलेल्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम