शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

वाशिम जिल्ह्यात कोरोना काळात ७० मुली बेपत्ता, ५९ घरी परतल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:24 IST

Girls go missing in Washim district २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना काळातील नऊ महिन्यात जिल्ह्यात एकूण ७० मुली घरून निघून गेल्या. त्यातील ५९ मुली पुन्हा घरी परतल्या; तर ११ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली.ठरावीक वय ओलांडल्यानंतर साधारणत: २० वर्षांपर्यंतच्या मुलींचे अचानक घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढलेले आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात २०२० मधील कोरोना काळात ७० मुली बेपत्ता झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. यासंदर्भात त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीची पावले उचलत तपासकार्य हाती घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सांगण्यावरून तथा मोबाइलवरील लोकेशनसह इतर स्वरूपातील सुगाव्यांवरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांचे पथक पाठवून ७० पैकी ५९ मुलींचा शोध घेण्यात वाशिम पोलीस दलाला यश मिळाले आहे; परंतु ११ मुली अद्याप बेपत्ता असून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात आहे. वयात आलेला मुलगा किंवा मुलगी घर सोडून जाण्याच्या कारणांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता, मुलांचा आई-वडिलांशी कमी होत चाललेला संवाद, मित्र-मैत्रिणींसोबत अधिक काळ घालवण्याची मुभा आणि मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळेच असे प्रकार घडत असल्याचे तपासादरम्यान आढळत असल्याचे ते म्हणाले. 

११ मुलींचा शोध लागेना२०२० या वर्षभराच्या काळात ७० मुली बेपत्ता झाल्या. त्यातील ११ मुलींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. मिळणाऱ्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. 

चार बेपत्ता मुलांचा लागला शोध२०२० या वर्षांत मुलींसोबतच चार अल्पवयीन मुलेही बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत चारही मुलांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल आणि जून या महिन्यांमध्ये ही मुले बेपत्ता झाली.

जिल्ह्यात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०२० या वर्षांत ७० मुली आणि ४ मुले बेपत्ता झाली होती. त्यातील ५९ मुली आणि चारही मुलांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासनास यश मिळाले आहे. इतर बेपत्ता मुलींचाही लवकरच शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात निश्चितपणे यश मिळेल अशी खात्री आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं