शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:22 IST

आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने मुंबई, पुणे, नाशिक यासह परराज्यात स्थलांतरीत झालेल्या मजूरांनी मुलाबाळांसह शेकडो किलोमिटरचा पायदळ प्रवास करून आपले गाव गाठले. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवार, २५ मे पर्यंत ६६ हजार ६०८ मजूरांची घरवापसी झाली. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांनी ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण केला; तर इतर १६ हजार १९५ मजूर अद्याप ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आधीच २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाने गत काही महिन्यांमध्ये जगभरात थैमान घातले. त्याची झळ महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात बसली. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने तातडीची पाऊले उचलत २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आल्याने परराज्य व अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या शेकडो मजूरांनी कोरोनाच्या भितीपोटी पायदळ प्रवासाचा मार्ग स्विकारून शेकडो किलोमिटरचा पल्ला गाठला व गाव जवळ केले. प्राप्त माहितीनुसार, ‘लॉकडाऊन’च्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले. तसेच २४ मार्च ते २५ मे २०२० या ‘लॉकडाऊन’च्या दोन महिन्याच्या कालावधीत ३५ हजार ६०८ मजूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला.

मागेल त्याला काम देण्याची प्रशासनाची तयारीवाशिम जिल्ह्यात २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूरीचे काम देण्याची तयारी दर्शविली असून सद्य:स्थितीत ४९१ पैकी २४१ ग्रामपंचायतींमध्ये ७०४ कामे सुरू देखील करण्यात आली आहेत. यामाध्यमातून ४ हजार ११३ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.रोजगार हवा तर करावी लागणार अंगमेहनतीची कामेकोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांमधून मजूर, कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्यातील अनेकजण कंपन्यांमध्ये कामाला होते. रोजगार हमी योजनेची कामे मात्र पूर्णत: अंगमेहनतीची असून रोजगार हवा तर त्याची तयारी या मजूर, कामगारांना ठेवावी लागेन, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात आधीच नोंदणीकृत जॉबकार्डधारक २ लाख २० हजार आणि परगावहून आपापल्या गावी परतलेल्या प्रत्येक मजूर, कामगारास रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी आहे. त्यानुषंगाने तहसीलदार, मंडळ अधिकारी, रोजगार सेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षणही केले जात आहे. रोजगारापासून कुणीही वंचित राहणार नाही.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार