शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६६,६०८ मजूरांची घरवापसी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:22 IST

आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने मुंबई, पुणे, नाशिक यासह परराज्यात स्थलांतरीत झालेल्या मजूरांनी मुलाबाळांसह शेकडो किलोमिटरचा पायदळ प्रवास करून आपले गाव गाठले. त्यानुसार, जिल्ह्यात सोमवार, २५ मे पर्यंत ६६ हजार ६०८ मजूरांची घरवापसी झाली. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांनी ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण केला; तर इतर १६ हजार १९५ मजूर अद्याप ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आधीच २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडल्याने भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाने गत काही महिन्यांमध्ये जगभरात थैमान घातले. त्याची झळ महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात बसली. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने तातडीची पाऊले उचलत २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आल्याने परराज्य व अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या शेकडो मजूरांनी कोरोनाच्या भितीपोटी पायदळ प्रवासाचा मार्ग स्विकारून शेकडो किलोमिटरचा पल्ला गाठला व गाव जवळ केले. प्राप्त माहितीनुसार, ‘लॉकडाऊन’च्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले. तसेच २४ मार्च ते २५ मे २०२० या ‘लॉकडाऊन’च्या दोन महिन्याच्या कालावधीत ३५ हजार ६०८ मजूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यापैकी ५० हजार ४१३ मजूरांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला.

मागेल त्याला काम देण्याची प्रशासनाची तयारीवाशिम जिल्ह्यात २ लाख २० हजार जॉबकार्डधारक मजूर असून त्यात आता ६६ हजार ६०८ मजूरांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूरीचे काम देण्याची तयारी दर्शविली असून सद्य:स्थितीत ४९१ पैकी २४१ ग्रामपंचायतींमध्ये ७०४ कामे सुरू देखील करण्यात आली आहेत. यामाध्यमातून ४ हजार ११३ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.रोजगार हवा तर करावी लागणार अंगमेहनतीची कामेकोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांमधून मजूर, कामगार आपापल्या गावी परतले आहेत. त्यातील अनेकजण कंपन्यांमध्ये कामाला होते. रोजगार हमी योजनेची कामे मात्र पूर्णत: अंगमेहनतीची असून रोजगार हवा तर त्याची तयारी या मजूर, कामगारांना ठेवावी लागेन, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात आधीच नोंदणीकृत जॉबकार्डधारक २ लाख २० हजार आणि परगावहून आपापल्या गावी परतलेल्या प्रत्येक मजूर, कामगारास रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी आहे. त्यानुषंगाने तहसीलदार, मंडळ अधिकारी, रोजगार सेवकांच्या माध्यमातून सर्वेक्षणही केले जात आहे. रोजगारापासून कुणीही वंचित राहणार नाही.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार