शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

दोन वर्षांत ६ हजार मातांना ‘जननी सुरक्षा’ लाभ!

By admin | Updated: January 30, 2017 03:32 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचण

वाशिम, दि. २९- सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसुती झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना ७00 आणि शहरी भागातील महिलांना शासनाकडून ६00 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यानुसार, गत दोन वर्षांत ६ हजार ५२ मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. असे असले तरी नव्याने लग्न झालेल्या महिलांना मात्र ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचणी जाणवत असून, २0१६-१७ या आर्थिक वर्षांत अशा लाभार्थींची संख्या सुमारे ११00 असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ह्यआरसीएचह्ण बाबींमध्ये केंद्रशासनाकडून जननी सुरक्षा योजना राबविली जाते. सन २00६ पासून महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यात सुरु केली. याअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबात समाविष्ट होणार्‍या गर्भवती मातांना तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटूंबातील गर्भवती मातांना आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, याअंतर्गत मिळणारी तुटपूंजी रक्कम संबंधित लाभार्थींच्या आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केली जात असल्याने ज्यांचे बँकेत खाते नाही, अशा मातांची सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती होऊनही त्यांना शासनाकडून देय अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या शेतकरी, शेतमजूर कुटूंबातील असंख्य महिलांचे अद्याप कुठल्याच बँकेत खाते नाही. यासह विवाहानंतर परगावहून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या महिलांकडे कुठलेही ओळखपत्र राहत नसल्याने त्यांचे खाते बँकेत निघणे कठीण झाले आहे. अशा प्रसूत होणार्‍या मातांना देखील शासनाच्या अर्थसहाय्यापासून मुकावे लागत आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसारच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूत होणार्‍या मातांना अर्थसहाय्य दिले जात आहे. संबंधित लाभार्थींनी हा लाभ मिळविण्याकरिता बँकेत खाते उघडून प्रशासनास सहकार्य करायला हवे.डॉ.एन.बी.पटेल,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम