शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

दोन वर्षांत ६ हजार मातांना ‘जननी सुरक्षा’ लाभ!

By admin | Updated: January 30, 2017 03:32 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचण

वाशिम, दि. २९- सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसुती झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना ७00 आणि शहरी भागातील महिलांना शासनाकडून ६00 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यानुसार, गत दोन वर्षांत ६ हजार ५२ मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. असे असले तरी नव्याने लग्न झालेल्या महिलांना मात्र ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचणी जाणवत असून, २0१६-१७ या आर्थिक वर्षांत अशा लाभार्थींची संख्या सुमारे ११00 असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ह्यआरसीएचह्ण बाबींमध्ये केंद्रशासनाकडून जननी सुरक्षा योजना राबविली जाते. सन २00६ पासून महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यात सुरु केली. याअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबात समाविष्ट होणार्‍या गर्भवती मातांना तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटूंबातील गर्भवती मातांना आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, याअंतर्गत मिळणारी तुटपूंजी रक्कम संबंधित लाभार्थींच्या आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केली जात असल्याने ज्यांचे बँकेत खाते नाही, अशा मातांची सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती होऊनही त्यांना शासनाकडून देय अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या शेतकरी, शेतमजूर कुटूंबातील असंख्य महिलांचे अद्याप कुठल्याच बँकेत खाते नाही. यासह विवाहानंतर परगावहून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या महिलांकडे कुठलेही ओळखपत्र राहत नसल्याने त्यांचे खाते बँकेत निघणे कठीण झाले आहे. अशा प्रसूत होणार्‍या मातांना देखील शासनाच्या अर्थसहाय्यापासून मुकावे लागत आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसारच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूत होणार्‍या मातांना अर्थसहाय्य दिले जात आहे. संबंधित लाभार्थींनी हा लाभ मिळविण्याकरिता बँकेत खाते उघडून प्रशासनास सहकार्य करायला हवे.डॉ.एन.बी.पटेल,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम