शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत ६ हजार मातांना ‘जननी सुरक्षा’ लाभ!

By admin | Updated: January 30, 2017 03:32 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचण

वाशिम, दि. २९- सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसुती झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना ७00 आणि शहरी भागातील महिलांना शासनाकडून ६00 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यानुसार, गत दोन वर्षांत ६ हजार ५२ मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. असे असले तरी नव्याने लग्न झालेल्या महिलांना मात्र ओळखपत्रांअभावी अर्थसहाय्य मिळविण्यात अडचणी जाणवत असून, २0१६-१७ या आर्थिक वर्षांत अशा लाभार्थींची संख्या सुमारे ११00 असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ह्यआरसीएचह्ण बाबींमध्ये केंद्रशासनाकडून जननी सुरक्षा योजना राबविली जाते. सन २00६ पासून महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्यात सुरु केली. याअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबात समाविष्ट होणार्‍या गर्भवती मातांना तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटूंबातील गर्भवती मातांना आर्थिक लाभ दिला जातो. मात्र, याअंतर्गत मिळणारी तुटपूंजी रक्कम संबंधित लाभार्थींच्या आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा केली जात असल्याने ज्यांचे बँकेत खाते नाही, अशा मातांची सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती होऊनही त्यांना शासनाकडून देय अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या शेतकरी, शेतमजूर कुटूंबातील असंख्य महिलांचे अद्याप कुठल्याच बँकेत खाते नाही. यासह विवाहानंतर परगावहून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या महिलांकडे कुठलेही ओळखपत्र राहत नसल्याने त्यांचे खाते बँकेत निघणे कठीण झाले आहे. अशा प्रसूत होणार्‍या मातांना देखील शासनाच्या अर्थसहाय्यापासून मुकावे लागत आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसारच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूत होणार्‍या मातांना अर्थसहाय्य दिले जात आहे. संबंधित लाभार्थींनी हा लाभ मिळविण्याकरिता बँकेत खाते उघडून प्रशासनास सहकार्य करायला हवे.डॉ.एन.बी.पटेल,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम