शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अवकाळी पाऊस, गारपिटीने ५,५९३ हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:59 IST

Washim News गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने ५५९३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. यामुळे २२ महसूली मंडळांतर्गत येणाऱ्या १४२ गावांमधील ७६०१ शेतकरी बाधित झाले असून तसा अहवाल प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, २२ आणि २३ मार्च राेजी देखील  काही ठिकाणी  अवकाळी पाऊस व गारपीट झाली असून यामुळे नुकसानाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता  आहे.तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे, जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकऱ्यांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे  नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानाचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ३९ गावांमध्ये १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २१२३ शेतकरी बाधित झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ४० गावांमध्ये ११७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १८६१ शेतकरी बाधित झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २० गावांमध्ये १६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीHailstormगारपीट