शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 10:55 IST

जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या तसेच होम क्वारंटीन कालावधी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. मजुर, कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केलेल्या आहेत. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.जिल्ह्यात रोजगाराची फारशी साधने उपलब्ध नसल्याने अनेकजण महानगर तसेच परराज्यात रोजगाराच्या शोधात जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. यामुळे कंपन्या, उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात जवळपास ७० हजार मजूर, कामगार परतले आहेत. यापैकी ५० हजार नागरिकांचा ‘होम क्वारंटीन’ कालावधी संपुष्टात आला. दरम्यान, परजिल्हा, परराज्यातून परतलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिल्या होत्या. कामे प्रस्तावित करण्यातच प्रशासनाचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने तुर्तास या मजुर, कामगारांना रोजगारासाठी कामे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मजुरांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला.जिल्ह्यात रोहयो अंतर्गतची ९१५० कामे विविध कारणांमुळे बंद पडलेली आहेत. नव्याने ४१०० कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत. जिल्ह्यात परतलेल्या मजुर, कामगारांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मजूरवर्गातून होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंंतर्गत मजूर, कामगारांना कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सध्या विविध कामांवर ३३०० मजूर काम करीत आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी,

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार