शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कारंजा हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:33 IST

कारंजा :  नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी  विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली .

ठळक मुद्देशहरासोबतच हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मुलभुत सोयी-सुविधांचा लाभ मिळणार .अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर' निधी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनांतर्गत हा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.  मान्यता प्राप्त केल्यानंतर प्रशासकीय मान्यतेस्तव प्रस्ताव शासनास सादर करावा लागणार आहे.

कारंजा :  नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी  विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली .

     कारंजा शहराच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून भरपूर निधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे. शहरासोबतच हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मुलभुत सोयी-सुविधांचा लाभ मिळणार असुन बायपास परिसरातील रस्त्यांचा कायापालट होणार असल्याचे आ.राजेंद्र पाटणी यांनी यावेळी सांगितले.  शहर व ग्रामीण दोन्ही भागांचा यातून कायापालट होणार असल्याने विकासकामांना गती मिळणार आहे. 

      हद्दवाढ क्षेत्रातील विकासासाठी शासनाकडून विशेष निधी देण्यात येतो. त्यानुसार कारंजा नगरपालिकेच्या हद्दवाढ विभागातील विकासासाठी ^‘अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर' निधी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनांतर्गत हा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.  सदर प्रकल्पाअंतर्गत एकूण रू. ५ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ रुपयाची मान्यता देण्यात आली असुन प्रकल्प खचार्चा ९० टक्के हिस्सा रक्कम रू.५,००,००,०००/- राज्य शासनाचा व १० टक्के हिस्सा रक्कम रू.५५,५५,५५५/- कारंजा नगरपालिकेचा राहणार आहे.   सदर योजनेअंतर्गत प्रामुख्याने १. पाणीपुरवठा व मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहीन्या २. आराखड्यातील आरक्षणे विकसित करणे (भूसंपादना व्यतिरीक्त) ३.  ग्रथांलय, वाचनालय, प्रेक्षागृह, नाट्यगृह, सभागृह ४. प्रमुख नागरी मार्ग ५. वाहनतळ, वाणिज्य संकुल, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी क्षेत्रीय कार्यालये  ६. उद्यान आणि हरितपट्टे विकसित करणे. निश्चित करण्यात येणाठया कामांना प्रकल्प खर्चाच्या मयार्देत सक्षम प्राधिकाºयांची मान्यता प्राप्त केल्यानंतर प्रशासकीय मान्यतेस्तव प्रस्ताव शासनास सादर करावा लागणार आहे. योजने अंतर्गत करण्यात येणाºया रस्त्यांच्या कामांना इतर कोणत््याही योजनेमधुन प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही अथवा सदरची कामे करण्यात आलेली नाही याची खातरजमा जिल्हाधिकारी यांनी करावी लागणार आहे. पाणी पुरवठा व मलनिस्सारणाच्या प्रकल्पामुळे प्रस्तावित रस्त्यांचे उत्खनन होणार नाही अशा प्रकारे कामांचे नियोजन तसेच कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणी पुरवठा व मलनिस्सारणाच्या प्रकल्पामुळे नव्याने नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी