शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

परराज्यातील ४,८०९ कामगार अडकले वाशिम जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:00 IST

४ हजार ८०९ कामगारांसह महाराष्ट्रातील ३६८ नागरिकांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले. हे कामगार अद्यापही जिल्ह्यातच असून, प्रशासनाने त्यांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवले आहे. या सर्व कामगारांची सकाळ, सायंकाळी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून, कोणातही कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्याने केंद्र आणि राज्य शासनानेही यावर नियंत्रणासाठी कठोर पावले ऊचलली आहेत. त्यात १५ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’सह सर्व दळणवळण सेवा (जिवनावश्यक सेवा वगळता) कोणत्याही जिल्ह्यांतून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजीच लॉकडाऊन ३ मे पर्यंत राहिल, असे घोषित केले. ऊदरभरणासाठी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह विविध कामांसाठी परराज्यातून वाशिम जिल्ह्यात आलेले कामगार अडकून पडले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अडकून पडलेल्या अशा कामगारांची माहिती प्रशासनाने संकलित केली. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून २० राज्यातील ४८०९ कामगार अडकलेअसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व कामगारांसाठी स्थानिक प्रशासनाने रिलिफ कॅम्प स्थापन करून त्यांच्या भोजनासह निवाºयाची व्यवस्था केली. दरम्यान, रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेल्या परराज्यातील या कामगारांना ९ दिवस पूर्ण झाले असून, या कामगारांची सकाळ, सायंकाळ, अशी दोन वेळा तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यात कोणाही कामगाराला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आली नाहीत.

लॉकडाऊन संपेपर्यंत कॅम्पमध्येच ठेवणारकोरोना विषाणूचा संसर्ग राज्यासह देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच सर्व जिल्ह्यांच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. अशात वाशिम जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात किंवा गावी पाठविणे अयोग्य ठरणार असून, कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लागू केलेले लॉकडाऊन संपेपर्यत या कामगारांना रिलिफ कॅम्पमध्येच ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

वाशिम जिल्ह्यात अडकून पडलेल्या २० राज्यातील ४ हजार ८०९ कामगारांसह महाराष्ट्रातील ३६८ नागरिकांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची दिवसातून दोन वेळा तपासणी होत असून, अद्याप कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग वा इतर आजार झाल्याची लक्षणे दिसून आली नाहीत.-डॉ. अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार