शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे; सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा

By दिनेश पठाडे | Updated: December 30, 2023 15:47 IST

आर्थिक मदत देण्याची मागणी

वाशिम : सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी असल्याचे जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केले आहे.  जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.

जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून खरीप हंगामात योग्य पाऊस झाला नाही. विलंबाने पाऊस झाल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली. परिणामी खरिपातील मूग, उडीद पिकांचा पेरा घटला. पेरणी झाल्यानंतर काही भागात जुलैच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्टमध्ये २० ते २५ दिवस पावसाने खंड दिला. त्यातच पिकावर येलो मोझॅक व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे उभे सोयाबीनचे पीक सुकून गेले. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने ३१ ऑक्टोबरला जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४८ पैसे काढली होती. त्यानंतर अंतिम पैसेवारी किती निघते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा प्रशासनाने ३० डिसेंबरला जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीमध्ये सर्वच महसुली गावांची पैसेवारी ५० पैक्षा कमी निघाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे शासनाने यापूर्वीच काही मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

तालुकानिहाय पैसेवारी

तालुका-गावे-पैसेवारीवाशिम -१३१-४८मालेगाव-१२२-४९रिसोड-१००-४७मंगरुळपीर-१३७-४७कारंजा-१६७-४७मानोरा-१३६-४८