शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

४७ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणी भरलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 11:11 IST

७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२० ग्राम पंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी १२० ग्रामपंचायतींची निवडही करण्यात आली. यापैकी ७३ ग्राम पंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला असून, अद्यापही ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही.ग्रामीण भागात उघड्यावरील शौचवारी कमी व्हावी याकरीता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. याशिवाय लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधादेखील उपलब्ध केली जाते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयासाठी जिल्ह्यातील १२० ग्रामपंचायतींची निवड सहा महिन्यांपूर्वी झाली. सार्वजनिक शौचालयासाठी केंद्र सरकारकडून १ लाख २० हजार आणि राज्य शासनाकडून ६० हजार असे एकूण १ लाख ८० हजार रुपये अनुदानही मिळते. ग्राम पंचायतींना लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून २० हजार रुपये भरावे लागतात. मध्यंतरी मार्च, एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे ही प्रक्रिया प्रभावित झाली होती. लॉकडाऊन व संचारबंदीतून शिथिलता मिळाल्यानंतर लोकवर्गणी भरणाऱ्या ग्रामपंचायतींना सार्वजनिक शौचालयाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली जात आहे. २० जुलैपर्यंत ४७ ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीचे २० हजार रुपये भरले नसल्याने १.८० लाखाचा निधी पडून आहे. वारंवार सूचना देऊनही या ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर लोकवर्गणीचा हिस्सा भरला नाही तर त्यांची निवड रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन ग्रामपंचायतींचा पुढाकारलोकवर्गणीचा हिस्सा भरून कारंजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्णही केले आहे.

७० ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यतालोकवर्गणीची रक्कम भरल्यानंतर ७० ग्राम पंचायतींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरीत ४७ ग्राम पंचायतींनी लवकराव लवकर लोकवर्गणी भरावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. लोकवर्गणी भरल्यानंतर त्यांनाही तात्काळ मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgram panchayatग्राम पंचायत