शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

४६ हजार कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’!

By admin | Updated: March 9, 2017 02:21 IST

महावितरण हतबल; वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण; रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढले!

सुनील काकडे वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील तब्बल ४६ हजारांच्या आसपास कृषिपंपांना ऑटो स्विच बसविलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असून, रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तथापि, सर्वांगाने नुकसानदायक ठरू पाहणारे ऑटो स्विच काढून टाकण्याबाबत महावितरणकडून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दस्तुरखुद्द महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी बुधवार, ८ मार्च रोजी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांनी शेतांमधील मोटारपंपांना ऑटो स्विच बसविले आहेत. गत दोन महिन्याच्या काळात त्यापैकी चार हजार पंपांचे ह्यऑटो स्विचह्ण हटविण्यात महावितरणला यश आले असले, तरी अद्याप ४६ हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न कायम असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच रिमोटद्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकर्‍यांनी हा प्रकार अवलंबिला आहे. परंतु केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ह्यऑटो स्विचह्ण अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळून खाक होत आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने मोटारपंपाचे ऑटो स्विच काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.