शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

४६ हजार कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’!

By admin | Updated: March 9, 2017 02:21 IST

महावितरण हतबल; वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण; रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढले!

सुनील काकडे वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील तब्बल ४६ हजारांच्या आसपास कृषिपंपांना ऑटो स्विच बसविलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असून, रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तथापि, सर्वांगाने नुकसानदायक ठरू पाहणारे ऑटो स्विच काढून टाकण्याबाबत महावितरणकडून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दस्तुरखुद्द महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी बुधवार, ८ मार्च रोजी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांनी शेतांमधील मोटारपंपांना ऑटो स्विच बसविले आहेत. गत दोन महिन्याच्या काळात त्यापैकी चार हजार पंपांचे ह्यऑटो स्विचह्ण हटविण्यात महावितरणला यश आले असले, तरी अद्याप ४६ हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न कायम असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच रिमोटद्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकर्‍यांनी हा प्रकार अवलंबिला आहे. परंतु केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ह्यऑटो स्विचह्ण अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळून खाक होत आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने मोटारपंपाचे ऑटो स्विच काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.