शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

४६ हजार कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’!

By admin | Updated: March 9, 2017 02:21 IST

महावितरण हतबल; वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण; रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढले!

सुनील काकडे वाशिम, दि. ८- जिल्ह्यातील तब्बल ४६ हजारांच्या आसपास कृषिपंपांना ऑटो स्विच बसविलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असून, रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तथापि, सर्वांगाने नुकसानदायक ठरू पाहणारे ऑटो स्विच काढून टाकण्याबाबत महावितरणकडून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती दस्तुरखुद्द महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. बनसोडे यांनी बुधवार, ८ मार्च रोजी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत महावितरणच्या कृषिपंपधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांनी शेतांमधील मोटारपंपांना ऑटो स्विच बसविले आहेत. गत दोन महिन्याच्या काळात त्यापैकी चार हजार पंपांचे ह्यऑटो स्विचह्ण हटविण्यात महावितरणला यश आले असले, तरी अद्याप ४६ हजार पंपांसंबंधीचा हा प्रश्न कायम असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.तथापि, भारनियमनासह तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच रिमोटद्वारे पंप सुरू करता यावा, यासाठी शेतकर्‍यांनी हा प्रकार अवलंबिला आहे. परंतु केवळ काही क्षणाच्या त्रासापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ह्यऑटो स्विचह्ण अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सध्या ग्रामीण भागात ठरावीक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विीज पुरवठा सुरळीत होताच एकाचवेळी सर्व शेतकरी रिमोटद्वारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळून खाक होत आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरुस्त होत असल्याने मोटारपंपाचे ऑटो स्विच काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.