शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

वाशिम जिल्ह्यातील ४३ प्रकल्पांनी गाठला तळ!

By admin | Updated: April 11, 2017 02:19 IST

शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली : उपाययोजनांबाबत प्रशासनाचे धिमे धोरण

वाशिम : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ४३ लघुप्रकल्पांनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. असे असताना अद्याप कृती आराखड्याच्या अमंलबजावणीच्या दृष्टिने कुठलेही पाऊल उचलले नसल्याने पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जलसंपदा विभागाकडून सोमवारी मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्पांपैकी ११ लघुप्रकल्प पूर्णत: कोरडे पडले असून, ३२ लघुप्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठय़ाची पातळी शून्य टक्क्यावर पोहचली आहे. उर्वरित तीन मध्यम आणि ७९ लघुप्रकल्पांपैकी २0 प्रकल्पांमध्ये 0 ते १0 टक्के जलसाठा शिल्लक असून २७ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के, ३0 प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के आणि केवळ पाच प्रकल्पांमध्येच ५0 ते ७५ टक्के पाणीसाठा आजरोजी शिल्लक आहे. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठय़ासंदर्भात विदारक परिस्थिती उद्भवल्यामुळे शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. असे असताना प्रशासकीय पातळीवरून मात्र अद्याप ठोस तथा प्रभावी उपाययोजना राबविण्याकामी धिमे धोरण अंगिकारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात रिसोड तालुका "डेंजर झोन"मध्ये

   जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुका यंदा पाणीटंचाईच्या बाबतीत ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. या तालुक्यात १७ लघुप्रकल्प असून आजमितीस त्यातील तब्बल १३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. दोन प्रकल्पांमध्ये१0 टक्क्यांपर्यंत; तर दोन प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुका असून या तालुक्यातील २१ पैकी ८ प्रकल्पांनी तळ गाठला असून उर्वरित १५ प्रकल्पांमधील पाणीसाठाही लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.