शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

वाशिम जिल्ह्यातील ४३ प्रकल्पांनी गाठला तळ!

By admin | Updated: April 11, 2017 02:19 IST

शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली : उपाययोजनांबाबत प्रशासनाचे धिमे धोरण

वाशिम : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ४३ लघुप्रकल्पांनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. असे असताना अद्याप कृती आराखड्याच्या अमंलबजावणीच्या दृष्टिने कुठलेही पाऊल उचलले नसल्याने पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जलसंपदा विभागाकडून सोमवारी मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्पांपैकी ११ लघुप्रकल्प पूर्णत: कोरडे पडले असून, ३२ लघुप्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठय़ाची पातळी शून्य टक्क्यावर पोहचली आहे. उर्वरित तीन मध्यम आणि ७९ लघुप्रकल्पांपैकी २0 प्रकल्पांमध्ये 0 ते १0 टक्के जलसाठा शिल्लक असून २७ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के, ३0 प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के आणि केवळ पाच प्रकल्पांमध्येच ५0 ते ७५ टक्के पाणीसाठा आजरोजी शिल्लक आहे. तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठय़ासंदर्भात विदारक परिस्थिती उद्भवल्यामुळे शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. असे असताना प्रशासकीय पातळीवरून मात्र अद्याप ठोस तथा प्रभावी उपाययोजना राबविण्याकामी धिमे धोरण अंगिकारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात रिसोड तालुका "डेंजर झोन"मध्ये

   जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रिसोड तालुका यंदा पाणीटंचाईच्या बाबतीत ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. या तालुक्यात १७ लघुप्रकल्प असून आजमितीस त्यातील तब्बल १३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. दोन प्रकल्पांमध्ये१0 टक्क्यांपर्यंत; तर दोन प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुका असून या तालुक्यातील २१ पैकी ८ प्रकल्पांनी तळ गाठला असून उर्वरित १५ प्रकल्पांमधील पाणीसाठाही लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.