शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:24 IST

कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

वाशिम : गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मधील १९६ आणि सन २०१८-१९ मधील २११ अशा एकूण ४०७ गटांची निवड झाली होती. तथापि पुरेसा निधी नसल्याने शेतकरी ृगटांची प्रस्तावित कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. सदर कामे पूर्ण होण्यासाठी कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन शेतकरी गटासह राज्यातील ४०७ गटांची उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांची जमिनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेता, राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देणे’ ही योजना सन २०१७-२०१८ पासून राबविण्यात येत आहे. प्रकल्प आराखड्यानुसार शेतकरी गटांना प्रस्तावित कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यात सन २०१७-१८ या वर्षात १९६ आणि २०१८-१९ या वर्षात २११ शेतकरी गटाची निवड झाली होती. प्रकल्प आराखड्यातील कामांसाठी यापूर्वी ६० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. उर्वरीत १० कोटींचा निधी मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी गटांची उर्वरीत कामे खोळंबली होती. उर्वरीत निधी देण्याची मागणी शेतकरी गटांनी कृषी विभागाकडे केली होती. शेतकरी गटांची मागणी लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन गटासह राज्यातील ४०७ शेतकरी गटांची प्रकल्प आराखड्यातील पुढील कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना