शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

मालेगावातील ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली लालफितशाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:44 IST

मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे.

- अमोल कल्याणकरलोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे. शहराला अद्याप एकाच जलकुंभातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया चाकातिर्थ प्रकल्पात अल्प जलसाठा असून यापुढे १० दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मालेगाव ग्राम पंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होऊन तीन वर्षांंचा कालावधी उलटला आहे. शहराची लोकसंख्या वाढली असून, त्या तुलनेत शहरातील भौतिक व मुलभूत सुविधांत मात्र फारशी सुधारणा झाली नाही. दरवर्षी उन्हाळ्यात शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकट असते. यावर्षीदेखील शहरवासी पाणीटंचाईला सामोेरे जात आहेत. शहराला गेल्या २५ वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यासाठी एकच जलकुंभ असून, या जलकुंभातून एकाच वेळी संपूर्ण शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पातही कमी जलसाठा असतो. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी अपुºया पावसामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. त्यावेळी चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा प्रकल्पापर्यंत पाणी आणून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरती योजना सुरू करण्यात आली. ती योजनाही फारसी उपयुक्त ठरली नाही. प्रत्यक्षात मालेगाव शहराची पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी प्रशासनाने ३५ कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. तथापि, या योजनेचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही. यावर्षीतर पाणीटंचाईने भीषण स्वरुप धारण केले आहे. तालुक्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. चाकातिर्थ प्रकल्पातही पुरेसा प्रमाणात जलसाठा नसल्याने शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. येत्या काही दिवसात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक ठरत आहे. 

मालेगाव शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल तसेच ३५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. - रेखा अरूण बळीनगराध्यक्ष, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई